शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

झाडावर चढण्याची नोकरी; पगार मिळणार अडीच लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 5:45 PM

होय! तुम्ही वाचलेले शीर्षक अगदी योग्य आहे.

पंकज जोशी

नाशिक - होय! तुम्ही वाचलेले शीर्षक अगदी योग्य आहे. झाडावर चढण्याचीच ही नोकरी आहे आणि त्यासाठी चांगला पगारही दिला जाणार आहे. पण ज्या झाडावर चढायचं आहे, ते झाड मात्र उंच आहे बरं का...म्हणजे कल्पवृक्ष समजलं जाणारं आपल्या कोकणातील नारळाचं झाड आणि नोकरी देणारेही कोकणातीलच कृषी उद्योजक आहे.

सध्या सोशल मीडियाच्या काही ग्रूपवर एक नोकरीची जाहिरात फिरत आहे. त्यातील मजकूर कुणाचंही लक्ष चटकन वेधून घेणारा आहे. त्यात लिहिलंय ‘कोकोनट ट्री कमांडो’ नियुक्त करणे आहे. शिक्षण अनुभवाची अट नाही. मात्र उमेदवाराला नारळाच्या झाडावर चढता येणे आवश्यक आहे. मात्र ज्यांना चढता येत नसेल, त्यांना रितसर प्रशिक्षण दिले जाईल असेही जाहिरातीत म्हटलंय. रत्नागिरीतील तरुण कृषी उद्योजक तुषार आग्रे यांनी ही अनोखी जाहिरात दिलीय.

‘कोकणात नारळाच्या बागा खूप आहेत. याशिवाय काही हौशी मंडळी आपल्या घराभोवती नारळाची झाडे लावताना दिसतात. पण नारळाची हवी तशी देखभाल केली जात नाही. याशिवाय नारळ जेव्हा उंच वाढतो, तेव्हा त्यावरून नारळ कसे खाली उतरावयाचे असाही प्रश्न असतो. त्यासाठी बागायतदार शेतकऱ्यांना किंवा परसबागेची आवड असलेल्यांना शोधाशोध करावी लागते. हीच गरज हेरून आम्ही नारळाच्या बागेची देखभाल करण्याचा आणि नारळ उतरविण्याची सेवा सुरू केली, मेकॅनिकल इंजिनिअर असलेले तुषार आग्रे सांगतात. 

पूर्वीसारखी नारळाच्या झाडावर चढणारी माणसे आता मिळत नाहीत. त्यामुळं आग्रे आणि त्यांचे सहकारी झाडावरून आधुनिक शिडीच्या साह्याने झाडावरचे नारळ उतरवून देणे, तसेच नारळाच्या झाडाची मशागतीपासून तर कीड-नियंत्रणापर्यंतची सर्व देखभाल करण्याची सेवा आपल्या स्वराज्य नावाच्या संस्थेमार्फत प्रदान करतात. त्यातून अनेकांना रोजगारही मिळाला आहे.‘कोकणातील नारळाची झाडे ही सरळसोट नाहीत. त्यावर चढण्यासाठी ‘आॅटोमॅटिक क्लाय्बिंग’ यंत्राचा उपयोग होत नाही. म्हणून आम्ही इथं आधुनिक पण मानवी पद्धतीनं हाताळता येईल अशी शिडी वापरतो. त्यासाठी होतकरूंना प्रशिक्षणही देतो. आमच्या सेवेविषयी अनेकांना माहिती झाल्याने आमचे कामही वाढत आहे. त्यातून भविष्यात एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात नारळ झाडावर चढून उतरविणाऱ्या 200 जणांना रोजगार मिळू शकतो’,असा विश्वास तुषार यांना वाटतो.

आंग्रे यांनी दिलेल्या जाहिरातीनुसार योग्य कुशल व्यक्तीला वर्षाला सुमारे अडीच लाखांपर्यंत पगार दिला जाणार आहे, शिवाय त्याच्या सुरक्षिततेसाठी विमाही 5 लाखांचा विमा आणि मेडिक्लेमची दिला जाणार आहे. नारळाचे झाड हे कल्पवृक्ष समजले जाते. त्याच्या पानांपासून ते फळापर्यंत प्रत्येक भागाचा वापर कसा करता येईल आणि त्यातून रोजगार निर्मिती व शेतकऱ्यांचे सक्षमीकरण कसे होईल? यासाठी तुषार आग्रे आणि त्यांचे सहकारी प्रयत्नशील असतात. त्यांच्या प्रयत्नांना आता यशही मिळत आहे आणि रोजगारनिर्मितीही होत आहे.

टॅग्स :NashikनाशिकjobनोकरीFarmerशेतकरी