शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वृक्षसंपदा खाक : दगडखाणीमधील भु-सुरुंग स्फोटाने भडकला वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 14:11 IST

डोंगरमाथ्यावरील मौलिक भारतीय प्रजातीच्या वृक्षसंपदेसह जैवविविधतेची अपरिमित हानी झाली. हा वनवा सलग दोन दिवस भडकल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

ठळक मुद्देवनक्षेत्राला लागून दगडखाणीत भुसुरूंगाचे स्फोटजैवविविधतेची अपरिमित हानीमहसुल-वन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे नाशिक दौ-यावर

नाशिक : पश्चिम नाशिक वनविभागाच्या सातपूर वनपरिमंडळाच्या हद्दीत असलेल्या बेळगाव ढगा येथील संतोषा, भागडी या दोन डोंगराच्या माथ्यावर कृत्रिम वनवा भडकून डोंगरमाथ्यावरील मौलिक भारतीय प्रजातीच्या वृक्षसंपदेसह जैवविविधतेची अपरिमित हानी झाली. हा वनवा सलग दोन दिवस भडकल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. डोंगराच्या पाठीमागे अगदी वनक्षेत्राला लागून दगडखाणीत भुसुरूंगाचे स्फोट घडविले जात असल्यामुळे त्याच्या ठिणग्या उडून वनवे भडकण्याचे प्रकार याठिकाणी सर्रासपणे घडत आहे; मात्र वनविभागाला अद्यापही याप्रकरणी एकही संशयित आढळून आला नसून केवळ ‘तपास’ सुरू आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते हे विशेष!बेळगाव ढगा ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या पुढकाराने वृक्षराजी संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहे. तीन वर्षांपुर्वी ४० एकर क्षेत्रात संतोषा, भागडी डोंगराच्या पायथ्याशी २७ हजाराहूंन अधिक रोपांची लागवड लोकसहभागातून करण्यात आली होती. डोंगराच्या एका बाजूला वृक्षराजी वाढवून वनक्षेत्राचे संवर्धन होत असले तरी दुसºया बाजूने सारूळ शिवारात हेच डोंगर दगडखाणीत उत्खनन करून पोखरले जात आहे. विशेष म्हणजे महसूल-वने विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गावकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बेळगाव ढग गावातील लोक डोंगराला हिरवाईचा साज चढविण्यासाठी कष्ट उपसत असताना दुसरीकडे या डोंगराची बाजू मात्र पोखरली जात आहे. त्यामुळे वनविभागाने येथील डोंगराचे व त्याभोवती असलेल्या वनक्षेत्राच्या संवर्धनासाठी कठोर पावले उचलून तातडीने संशयितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. गुरूवारी (दि.३०) महसुल-वन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे नाशिक दौ-यावर असून३३ कोटी वृक्षलागवडीबाबात ते प्रशासकीय बैठक घेणार आहेत. त्यांच्या दौ-याच्या तोंडावर कृत्रिम वनवा लागून दहा ते बारा वर्षांपुर्वीची शेकडो वृक्ष होरपळून गेली. तसेच पशुपक्ष्यांचे अंडी या भागात असल्यामुळे त्यांनीही आपली जागा सोडली नाही, परिणामी त्यांनाही जीव गमवावा लागल्याने पर्यावरण व निसर्गप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.जैवविविधतेची अपरिमित हानीपाच ते दहा वर्षांपुर्वी नैसर्गिकरित्या डोंगरमाथ्यावर वाढलेली तीवस, करंज, साग, कहांडळ, बेडशिंगे, धामोडा, करवंद, शिवण यांसारख्या भारतीय प्रजातीची शेकडो झाडे दोन दिवसीय कृत्रीम वनव्यात खाक झाली. जैवविविधतेची होणारी अपरिमित हानी भरून न येणारी असून वनविभाग व जिल्हा प्रशासन, महसूल विभागाने संयुक्तरित्या कठोर कारवाई करण्याची मागणी आपलं पर्यावरण संस्था, ग्रीन रिव्हॅल्यूएशन, बेळगाव ढगा ग्रामपंचायतीसह नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयforest departmentवनविभागfireआगforestजंगलenvironmentवातावरण