शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

त्र्यंबकेश्वरचा कचरा डेपो झाला मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 23:04 IST

त्र्यंबकेश्वर : येथील नगर परिषदेचा कचरा डेपो चार दिवसांपूर्वी घाणकचऱ्याने ओसंडून वाहत होता. कचऱ्याचे ढीग साचलेले होते. त्यामुळे दुर्गंधी सुटलेली होती. कंपोस्ट खत वगळता उर्वरित कचऱ्याची विल्हेवाट लावावी, कशी असा प्रश्न नगर परिषदेपुढे असतानाच तळवाडे येथील शेतकरी अंकुश बोडके यांनी स्वखर्चाने विनामोबदला हा कचरा घेऊन जाण्याची तयारी दर्शवली आणि ओसंडून वाहणारा कचरा डेपो मोकळा झाला.

ठळक मुद्देतळवाडेच्या शेतकऱ्याने नेला स्वखर्चाने वाहून

त्र्यंबकेश्वर : येथील नगर परिषदेचा कचरा डेपो चार दिवसांपूर्वी घाणकचऱ्याने ओसंडून वाहत होता. कचऱ्याचे ढीग साचलेले होते. त्यामुळे दुर्गंधी सुटलेली होती. कंपोस्ट खत वगळता उर्वरित कचऱ्याची विल्हेवाट लावावी, कशी असा प्रश्न नगर परिषदेपुढे असतानाच तळवाडे येथील शेतकरी अंकुश बोडके यांनी स्वखर्चाने विनामोबदला हा कचरा घेऊन जाण्याची तयारी दर्शवली आणि ओसंडून वाहणारा कचरा डेपो मोकळा झाला.

दरम्यान, जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी नुकतीच खत प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. त्र्यंबक नगर परिषदेचा कचरा डेपो चार दिवसांपूर्वी अक्षरशः भरलेला होता. चिंध्या, कपडे जमिनीत गाडले गेले तर त्याचे उत्तम खत निर्माण होते. नेमकी ही बाब तळवाडे येथील शेतकरी अंकुश बोडके यांनी हेरली आणि सर्व चिंध्या व तयार होत असलेला खतवजा कचरा ट्रकमध्ये भरून नेत स्वत:च्या शेतावर नेला. त्यामुळे कचरा डेपो मोकळा झाला.

पालिकेला असा कचरा नेणारा व डेपो मोकळा करून देणारा शेतकरी हवाच होता. त्यासाठी विनामोबदला हा कचरा देण्याची तयारी नगर परिषदेने दर्शवली होती. तळवाडे येथील शेतकरी अंकुश बोडके पालिकेला योगायोगाने भेटले आणि संपूर्ण कचरा त्यांनी स्वखर्चाने वाहून नेला. तीन दिवसात कंपोस्ट खत प्रकल्प वगळता डेपो मोकळा करण्यात आला.इन्फोपालिकेच्या गंगाजळीत भरत्र्यंबकला दररोज १० ते १५ ट्रॅक्टर ओला व सुका कचरा घंटागाडीद्वारे कचरा डेपोत वाहून आणला जातो. तसेच गावातील हॉटेल्स, खाणावळमधील शिळे, उष्टे अन्न टेम्पोत भरून तळवाडे येथील बायोगॅस प्रकल्पावर पाठविले जाते. गावातील लोकांकडून ओला व सुका कचरा विलगीकरण करूनच घंटागाडीत स्वीकारला जातो. कचरा डेपोत चिंध्यांचे गठ्ठे बांधले जातात. प्लॅस्टिकच्या वस्तू प्लॅस्टिक वितळविण्याच्या कंपनीत पाठविले जातात. चिंध्या खड्ड्यात टाकून बुजवल्या की त्याच्या पासून खत तयार होते. देवस्थानच्या निर्माल्यापासूनही सेंद्रिय खत तयार होते. हेच सेंद्रिय खत विकून पालिकेच्या गंगाजळीत अल्पशी का होईना भर पडत असते. 

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरgram panchayatग्राम पंचायत