शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

एका दिवसात दोन हजार बहिणी पोहचल्या पुण्याला; एस.टी. बसमधून महिलांना ५० टक्के सवलत

By sandeep.bhalerao | Updated: August 30, 2023 18:02 IST

महिलांना एस.टी. बसमधून अर्ध्या तिकीट दरात प्रवास करण्याची सवलत असल्याने या सवलीचा सर्वाधिक लाभ रक्षाबंधनाच्या दिवशी घेण्यात आला.

नाशिक: कोणत्याही एस.टी. बसमधून महिलांना ५० टक्के प्रवासाची सवलत असल्याने रक्षा बंधनाच्या दिवशी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसने प्रवास करीत बहिणींनी भावाचे घर गाठले. यामध्ये सर्वाधिक सुमारे दोन हजार भगिनी पुण्याला तर दिड हजार धुळ्याला पोहचल्याचा अंदाज आहे. रक्षाबंधनाच्या एकाच दिवशी सुमारे पाच हजार महिलांनी एस.टी. बसमधून प्रवास केल्याचा दावा महामंडळाकडून करण्यात आला. 

महिलांना एस.टी. बसमधून अर्ध्या तिकीट दरात प्रवास करण्याची सवलत असल्याने या सवलीचा सर्वाधिक लाभ रक्षाबंधनाच्या दिवशी घेण्यात आला. नाशिकमधील ठक्कर स्थानकात मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी झाली होती. या स्थानकातून धावणाऱ्या पुणे आणि धुळे बसेसला सर्वाधिक महिलांची गर्दी होती. पुण्याला जाण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स शिवाई, महामंडळाची शिवशाही याबसेसेला देखील अर्धे तिकीट असल्याने दिवसभर या बसेस प्रवाशांच्या गर्दीने भरभरून जात होत्या. हिच अवस्था धुळे ची  देखील होती. धुळ्याकडे जाणाऱ्या भगिनींनी बसमधून प्रवासाला पसंती दिल्याने स्थानकात धुळ्याला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधन