शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

अनधिकृत बांधकाम नियमितीकरण : प्रत्येक प्रकरणाच्या छाननीनंतर अंतिम कार्यवाही सुमारे २५०० प्रस्ताव दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:54 IST

नाशिक : नगररचना प्रशमित संरचना धोरण अंतर्गत अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी प्रस्ताव दाखल करण्याकरिता दिलेली मुदत गुरुवारी संपली. मुदतीत महापालिकेच्या नगररचना विभागाकडे २५०० प्रस्ताव दाखल झाल्याची माहिती सहायक संचालक आकाश बागुल यांनी दिली.

ठळक मुद्देप्राप्त प्रस्तावांची छाननी करून प्रकरणनिहाय कार्यवाही ६,५०० प्रकरणांपैकी २५०० हजारच प्रस्ताव दाखल

नाशिक : महाराष्ट्र नगररचना प्रशमित संरचना धोरण २०१७ अंतर्गत अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी प्रस्ताव दाखल करण्याकरिता दिलेली मुदत गुरुवारी (दि.३१) संपली. मुदतीत महापालिकेच्या नगररचना विभागाकडे सुमारे २५०० प्रस्ताव दाखल झाल्याची माहिती सहायक संचालक आकाश बागुल यांनी दिली. आता प्राप्त प्रस्तावांची छाननी करून प्रकरणनिहाय कार्यवाही केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, सुमारे ६,५०० प्रकरणांपैकी २५०० हजारच प्रस्ताव दाखल झाल्याने उर्वरित बांधकामांवर नियमानुसार कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.महाराष्टÑ शासनाने अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचे धोरण जाहीर केले असून, ३१ मेपर्यंत प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदत देण्यात आलेली होती. त्यानुसार, गेल्या महिनाभरापासून महापालिकेच्या नगररचना विभागात प्रस्ताव सादर करण्यासाठी विकासकांसह मालमत्ताधारकांची वर्दळ सुरू होती. मध्यंतरी क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने आयोजित कार्यशाळेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सदर धोरणाचे सादरीकरण करत मुदतीत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले होते अन्यथा १ जूननंतर अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालविण्याचा इशारा दिला होता. आयुक्तांच्या इशाऱ्यानंतर नगररचना विभागात प्रस्ताव दाखल करण्यासाठी गर्दी वाढली होती. गुरुवारी (दि.३१) अखेरच्या दिवशी सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत १४७५ प्रस्तावांची अधिकृत नोंदणी झालेली होती, तर सुमारे हजाराच्या आसपास प्रस्ताव सहायक संचालकसुमारे २५०० प्रस्ताव दाखल(पान १ वरून)नगररचना आकाश बागुल यांच्या दालनात स्वाक्षरीसाठी पडून होत्या. त्यावर बागुल यांच्याकडून स्वाक्षरी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.प्राप्त प्रस्तावांची आता प्रकरणनिहाय छाननी केली जाणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन अभियंत्यांमार्फत तांत्रिक बाबींची तपासणी केली जाणार आहे. तपासणीनंतर कम्पाऊंडिंग चार्जेस निश्चित करून वसुली केली जाईल आणि अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती सहसंचालकांनी दिली. डॉ. प्रवीण गेडाम हे आयुक्तपदी कार्यरत असताना त्यांनी बांधकाम नियमावलीचे उल्लंघन झाले असल्यास त्याबाबतचे प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी सुमारे २७०० प्रकरणे दाखल झालेली होती. प्रत्यक्षात उल्लंघन झालेल्या बांधकामांची संख्या सुमारे सहा ते साडेसहा हजार असल्याचे सांगितले जाते.मात्र, आता अनधिकृत बांधकाम नियमितीकरणाच्या धोरणांतर्गत सुमारे २५०० हजारच प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रस्ताव सादर न करणाºया उर्वरित बांधकामांवर महापालिकेचा हातोडा पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.