शहरं
Join us  
Trending Stories
1
Harshvardhan Patil : "२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं
2
Ratan Tata Hospitalised: रतन टाटा मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालंय? स्वतःच दिले 'हेल्थ अपडेट्स'
3
दत्ता भरणे 'रेड झोन'मध्ये? इंदापुरातील समीकरण बदललं, आकडे काय सांगतात?
4
धनगड जातीचे ६ दाखले रद्द; धनगर आरक्षणातील मोठा अडथळा दूर, गोपीचंद पडळकरांचा दावा
5
म्हणे, अमिताभ-शाहरुख या इस्रायली मशीनमधून घेतात थेरपी; खोटं बोलून लोकांना ३५ कोटींचा गंडा
6
T20 WC 2024 : दुष्काळात तेरावा महिना! हरमनच्या दुखापतीनं भारताची डोकेदुखी वाढली; नेमकं काय घडलं?
7
Senco Gold Share : 'या' ज्वेलरी कंपनीनं केली शेअर स्प्लिटची घोषणा; स्टॉकमध्ये तुफान तेजी; गाठली विक्रमी पातळी
8
केवळ काही सेकंदांत 400Cr ची कमाई...! TATA च्या शेअरनं रॉकेट स्पीड घेत केली कमाल, झुनझुनवाला झाल्या मालामाल
9
'त्या' राजकारण्यांना खडे बोल सुनावले पाहिजेत; राज ठाकरेंचं मराठी साहित्यिकांना आवाहन
10
कामगारांना सरकार देईल दरमहा ३ हजार रुपये पेन्शन; 'या' योजनेचा लाभ घेण्यासाठी जाणून घ्या, सविस्तर...
11
Mumbai Metro 3 Opens Today: मुंबईच्या पोटातून प्रवासाला सुरुवात, मेट्रो-३ मार्गिकेवरुन सुटली पहिली गाडी
12
हा आहे नवा भारत...ज्यानं अमेरिकन आर्मीलाही धूळ चारली; विश्वास बसत नसेल तर पाहा
13
हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांतरावर फडणवीसांचे एका वाक्यात उत्तर; म्हणाले, "तुम्ही नवीन काय..."
14
IND vs BAN Video: भन्नाट! Hardik Pandya ने न बघता मारला अफलातून चौकार, चेंडू किपरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पार, समालोचकही अवाक्
15
भारताची 'पूजा' पाकिस्तानच्या क्रिकेटपटूशी विवाह करणार; लग्नाआधी इस्लाम धर्म स्वीकारणार
16
आपच्या खासदारावर ईडीची छापेमारी; फायनान्सरही कचाट्यात
17
"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला
18
४१००० मृत्यू, मोठा विध्वंस, तरीही हमासचे सैन्य मागे हटलेले नाही; १०१ इस्रायली अजूनही ओलीस
19
"एक दिवस सगळं संपलं, शूटिंगवरुन घरी येते तेव्हा..."; अभिनेत्रीने आधी वडील गमावले मग आई
20
श्रीकांत शिंदेंचा विश्वासू शिलेदार उद्धव ठाकरेंकडे परतला; CM एकनाथ शिंदेंना धक्का

मराठवाडा पाटबंधारे खात्याचे विनास्वाक्षरी स्मरणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 1:02 AM

नाशिक : जायकवाडी धरणासाठी नाशिक व नगरमधून पाणी सोडण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालकांनी विभागीय आयुक्तांना गुरुवारी पुन्हा स्मरणपत्र पाठविले असून, या पत्रात पाणी सोडण्यासाठी करावयाच्या सर्व कार्यवाहींची पूर्तता करण्याचा एकीकडे आग्रह धरताना दुसरीकडे मंगळवारी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. अवघ्या दोन दिवसांत पाणी सोडण्यासाठी दबाव टाकणाऱ्या कार्यकारी संचालकांना मात्र स्मरणपत्रावर स्वत:च्या स्वाक्षरी करण्याचा विसर पडला आहे.

ठळक मुद्देतीन दिवसांत दुसरे पत्र : पाणी सोडण्यासाठी दबाव

नाशिक : जायकवाडी धरणासाठी नाशिक व नगरमधून पाणी सोडण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालकांनी विभागीय आयुक्तांना गुरुवारी पुन्हा स्मरणपत्र पाठविले असून, या पत्रात पाणी सोडण्यासाठी करावयाच्या सर्व कार्यवाहींचीपूर्तता करण्याचा एकीकडे आग्रह धरताना दुसरीकडे मंगळवारी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. अवघ्या दोन दिवसांत पाणी सोडण्यासाठी दबाव टाकणाऱ्या कार्यकारी संचालकांना मात्र स्मरणपत्रावर स्वत:च्यास्वाक्षरी करण्याचा विसर पडला आहे.कार्यकारी संचालकांनी नाशिक व औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांना या संदर्भात पत्र पाठविले असून, त्यात महाराष्टÑ जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, उच्च न्यायालयातील जनहित याचिका व गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने मंगळवारी पाणी सोडण्याबाबत दिलेल्या पत्राचा हवाला देत अद्यापही पाणी सोडण्यात आले नसल्याचे म्हटले आहे.कार्यकारी संचालकांच्या या स्मरणपत्रावर मात्र त्यांनी स्वाक्षरी केलेली नसल्याने या पत्राच्या सत्यतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार विनास्वाक्षरी पत्र पाठवून पाणी सोडण्यासाठी कार्यकारी संचालकांनी टाकलेल्या दबावामुळे विभागीय आयुक्त नाराज झाल्याचे सांगण्यात आले. उर्ध्व भागातील धरणातून पाणी सोडण्यास शेतकरी संघटना, राजकीय पक्ष, शेतकरी व नागरिकांकडून होत असलेला विरोध पाहता, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यात यावा तसेच पोलीस बंदोबस्तात कोल्हापूर बंधाºयांवरील निडल्स काढून टाकाव्यात अशा प्रकारच्या डझनभर सूचना या पत्रात विभागीय आयुक्तांना दिल्या आहेत व येत्या ३१ आॅक्टोबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पाणी सोडावे अन्यथा महाराष्टÑ जलसंपती नियमन प्राधिकरण अधिनियम २००५ मधील कलम क्रमांक २६ नुसार कारवाई होऊ शकते याची आठवणही करून दिली आहे.