शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
3
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
4
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
5
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
6
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
7
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
8
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
9
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
10
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
11
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
12
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
13
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
14
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
15
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
16
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
17
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
18
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
19
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
20
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा

वादग्रस्त पुलाला विनाचर्चा मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 11:14 PM

पूरस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या गोदावरी नदीवरील दोन नव्या पुलांवरून गेल्यावर्षी भाजपमध्ये वाद पेटला होता. मात्र, स्थायी समितीच्या मंगळवारी (दि.१९) झालेल्या बैठकीत यातील एका १८ कोटी रुपयांच्या पुलास विनाचर्चा मंजुरी देण्यात आली. ऐन कोरोना संकटाच्या काळातदेखील धावपळीत बोलाविण्यात आलेल्या बैठकीच्या पहिल्याच सुमारे पन्नास कोटी रुपयांच्या कामांना अशाच प्रकारे विकासाची कामे म्हणून विनाचर्चा मंजुरी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देस्थायी समितीत निर्णय : ५० कोटींच्या कामांना मान्यता

नाशिक : पूरस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या गोदावरी नदीवरील दोन नव्या पुलांवरून गेल्यावर्षी भाजपमध्ये वाद पेटला होता. मात्र, स्थायी समितीच्या मंगळवारी (दि.१९) झालेल्या बैठकीत यातील एका १८ कोटी रुपयांच्या पुलास विनाचर्चा मंजुरी देण्यात आली. ऐन कोरोना संकटाच्या काळातदेखील धावपळीत बोलाविण्यात आलेल्या बैठकीच्या पहिल्याच सुमारे पन्नास कोटी रुपयांच्या कामांना अशाच प्रकारे विकासाची कामे म्हणून विनाचर्चा मंजुरी देण्यात आली आहे.मनपाच्या महासभेसाठी असलेल्या दालनात स्थायी समितीची सभा नूतन सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विविध विषयांना मान्यता देण्यात आली. परंतु सर्वाधिक महत्त्वाचा विषय गोदावरी नदीवरील पुलांचा होता. नदीच्या पुलापलीकडे निर्जन जागा असतानादेखील या ठिकाणी दोन पूल बांधण्यात येत असून, त्यासाठी भाजपच्या काही नगरसेवकांचा आग्रह होता. तर आमदार देवयानी फरांदे यांच्यासह काही नगरसेवकांनी विरोध केला होता. जलसंपदा विभागाची कोणतीही परवानगी न घेतला हा पूल बांधण्यात येत आहे. मुळात पूररेषेची तीव्रता कमी करण्यासाठी नदी प्रवाहाचे अडथळे हटविण्याची केंद्र शासनाच्या एका संस्थेने महापालिकेला शिफारस केली असताना दुसरीकडे मात्र पूल बांधण्याचा प्रस्ताव होता. तो महासभेत गेल्यावेळच्या महापौरांनी मंजूर केला होता. तर यंदा सभापती गणेश गिते यांच्या काळात तो मंजुरीसाठी स्थायी समितीवर सादर होता. त्यानुसार १७ कोटी ९४ लाख रुपयांच्या या प्रस्तावाला भाजपच्या किंवा अन्य कोणत्याही पक्षाच्या सदस्यांनी चर्चेला मान्यता दिली.दरम्यान, या पहिल्याच बैठकीत सुमारे पन्नास कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. यात सातपूर विभागात सुला वाइन चौक ते दत्तमंदिर दरम्यान नासर्डी नदीवर पूल बांधणे, विविध ठिकाणी मलनिस्सारण देखभाल दुरुस्ती, पाइपलाइन टाकणे, गळती बंद करणे अशाप्रकारच्या कामांचा समावेश होता. बैठकीत सुप्रिया खोडे यांनी प्रभागातील गोठ्यांचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर सभापतींनी ते शहराबाहेर हटविण्याचे आदेश दिले तर कल्पना पांडे यांनी प्रभागात पावसाळी पाण्याच्या निचºयासाठी दिलेले काम वर्षभरापासून होऊ शकले नाही, याबाबत तक्रार केली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक