शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

अन्यायकारक घरपट्टीवाढीबाबत संभ्रम

By admin | Published: February 21, 2016 10:20 PM

येवला : अपिलीय समिती स्थापन करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

दत्ता महाले येवलायेवला नगरपालिकेने शहरातील १९९४ पूर्वीच्या इमारतींना वार्षिक भाडे अंदाजी आकारून तर सन १९९४ नंतरच्या इमारतींना भांडवलीमूल्यावर आधारित कर आकारणी न करता चौरस मीटरप्रमाणे घरगुती आणि वाणिज्य वापरासाठीच्या कर दरानुसार घरपट्टी आकारली आहे. पालिका मार्चअखेर१०० टक्के वसुलीचा फंडा वापरत असली तरी शहरवासीयांना ही घरपट्टीवाढ अन्यायकारक वाटत आहे. घरपट्टीबाबत नगर परिषद आणि भारतीय जनता पक्षाच्या तू तू मै मैच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे संभ्रम निर्माण झाला आहे.याविरोधात केवळ तीस टक्के घरपट्टी भरून या प्रकरणी अपिलीय समितीकडे दाद मागणार असल्याची भूमिका काही नागरिकांनी घेतली आहे. दरम्यान, पालिकेने या प्रकरणी अपिलीय समितीचे गठन व्हावी म्हणून, जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल केला आहे. या समितीच्या गठणानंतर, काही अशी घरपट्टी कमी होईल या आशेवर शहरवासीय आहेत.नगरपरिषदेला कायद्यानुसार चार वर्षांनी मालमत्ता करामध्ये सुधारणा करावी लागते. त्यानुसार सुधारणा होणे अपेक्षति होते. परंतु त्यावेळी भांडवली मूल्यावर कर आकारणी जाचक स्वरु पाची असल्याने ती रद्द करून प्रचिलत पद्धतीनुसार वाढ करण्यास पालिकेने मंजुरी दिली होती. यानुसार सन २०१५-१६ मध्ये सुधारणा करण्यात येऊन २५ ते ४० टक्के पर्यत घरपट्टीत वाढ केली आहे.शहर हद्दीतील १२ हजार घर,जागा,व स्थावर मालमत्ता यांचे भोगवाटदार,व घर मालक यांनी पैकी केवळ२५० नागरिकांनी या वाढीबाबत मुख्याधिकारी यांचेकडे दाद मागितली आहे.नगरपरिषदेने घर पट्टी आकारणी करून त्यावर बर्याच घरमालक नागरिकांनी लेखी व तोंडी अपील दाखल केलेले असतानाही, बदल झालेला नाही. मनमाड नगरपरिषदेचा अंतिम चतुर्थ वार्षिक कर आकारणी नुकतीच झालेली असुन त्यांनी जुन्या इमारतीवर वार्षिक भाडे अंदाजावर वाढ केली तर नवीन बांधकामावर भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी आकारली आहे.येवले न.पा. ने केलेली वाढ ही अवास्तव असल्याचा पवित्र भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. पालिकेने नागरिकांना यावाढीवर हरकतीसाठी पर्याय उपलब्ध करून दिला होता. नागरिकांनी घरपट्टीसाठी ३० टक्के रक्कम जरी पालिकेत भरली तरी शासनाचे सोफ्टवेअर उर्वरित रक्कम थकबाकी असल्याचे दाखवत आहे. अवास्तव केलेली वाढ काही अंशी कमी करून सर्वच जनतेला दिलासा द्यावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे. या आकारणीत मागील वर्षाचा फरक वसूल करताना कमी होणारी रक्कम ही पुढील वर्षासाठी आगावू जमा करण्यात यावी असे नागरिकांचे म्हणणे आहे.