शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

मोदी सरकार पायउतार होईपर्यंत 'तो' अर्धनग्न राहणार होता, पण आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 10:47 IST

लोकसभा निवडणुकीच्या वेळी पिंपळगाव बसवंतला झालेल्या सभेपूर्वीही डोंगरे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. तर शरद पवार यांच्या सभेत त्यांनी अर्धनग्न अवस्थेतच व्यासपीठावर जात निवेदन दिले होते.

पाटोदा - लोकसभा निवडणुकीत शेतकरीविरोधी सरकार म्हणून आरोप करत केंद्रातील मोदी सरकार जोपर्यंत पायउतार होत नाही तोपर्यंत अंगात शर्ट-बनियन न घालता अर्धनग्न आंदोलन करत सर्वांचे लक्ष वेधून घेणारे नगरसूल, ता. येवला येथील शेतकरी कृष्णा भगवान डोंगरे यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीतील मतदानापर्यंत आपले आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार केला आहे. 

लोकसभा निवडणुकीतील निकालाबाबत अपेक्षाभंग झालेल्या डोंगरे यांनी सावध पवित्रा घेत विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाच्या दिवसापर्यंत आंदोलनाचा कालावधी वाढविला आहे. गेल्या दोन वर्षापासून नगरसूल येथील कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने विविध अनोखे आंदोलने करत भाजपा सरकारची डोकेदुखी वाढविली आहे. तालुक्यातील पूर्वोत्तर दुष्काळी असलेल्या नगरसूल गावात कृष्णा आपल्या कुटुंबासह शेती करतो. सन 2017 मध्ये कांद्याला 100 ते 125 रुपये भाव मिळाला म्हणून डोंगरे यांनी पाच एकर पिकाला अग्निडाग देत सरकारचा प्रतीकात्मक निषेध केला होता. 

त्यानंतर येवला तालुका दुष्काळी जाहीर करावा यासाठी 24 ऑक्टोबर 2018 रोजी मुख्यमंत्र्यांना स्वत:च्या रक्ताने पत्र लिहित मागणी केली होती. त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस हे सरकार चालविताना उत्कृष्ट अभिनय करत असल्याचा आरोप करत त्यांना अल्बम काढण्यासाठी 500 रुपयांचे निधी देण्याचे त्यांनी जाहीर केल्याने येवल्यातील मुख्यमंत्र्यांच्या सभेअगोदर त्यांना पोलिसांनी स्थानबद्धही केले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंगरे यांनी केंद्रातील पार्श्वभूमीवर डोंगरे यांनी केंद्रातील मोदी सरकार जोपर्यंत पायउतार होत नाही तोवर अंगात शर्ट व बनियन न घालता अर्धनग्न आंदोलन पुकारले होते. 

लोकसभा निवडणुकीच्या वेळी पिंपळगाव बसवंतला झालेल्या सभेपूर्वीही डोंगरे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. तर शरद पवार यांच्या सभेत त्यांनी अर्धनग्न अवस्थेतच व्यासपीठावर जात निवेदन दिले होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार प्रचंड बहुमताने पुन्हा सत्तारुढ झाल्यानंतर डोंगरे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. मात्र निवडणूक निकालाने अपेक्षाभंग झालेल्या डोंगरे यांनी आता सावध भूमिका घेत राज्यातील विधानसभा निवडणुकीतील मतदानापर्यंत आपले आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार केला आहे. 

शासनाने शेतकऱ्यांना फसविल्यामुळेच शासनाविरुद्ध मनात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे मला हे आंदोलन करावे लागत आहे. लोकसभा निवडणूक झाली मात्र आता विधानसभेच्या मतदानापर्यंत माझे आंदोलन सुरुच राहील. आता तरी सरकारला जाग यावी - कृष्णा डोंगरे, शेतकरी 

टॅग्स :FarmerशेतकरीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019