शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

वाहतूक कोंडीमुळे मंत्री, आमदारांचे ‘वंदे भारत’; नाशिक- मुंबई रोडची दुरवस्था

By संकेत शुक्ला | Updated: July 7, 2024 21:29 IST

रेल्वेने प्रवास करून नियोजन बैठकीला हजेरी

संकेत शुक्ल, नाशिक: रस्त्यावर पडलेले खड्डे... कसारा घाटात कोसळलेली दरड आणि महामार्गावर कायम होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका बसल्यामुळे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह आमदारांना वंदे भारत रेल्वेने प्रवास करीत जिल्हाधिकारी कार्यालय गाठावे लागले. वाहतूककोंडीमुळे जनता त्रस्त झालेली असताना त्याचा फटका लोकप्रतिनिधींनाही बसल्याने त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत सदस्यांनी नाराजीचा सूर आळवला.

त्यावर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात सोमवारी (दि.८) बैठक आयोजीत करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. लोकसभा निवडणूक तसेच विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकलेली जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि. ७) पार पडली. यावेळी उपस्थित असलेल्या जवळपास सर्वच आमदारांनी मुंबईला जात असताना येणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला. आ. कोकाटे यांनी याप्रश्नी संबंधित विभागांना धारेवर धरीत महामार्गावर लावण्यात येणाऱ्या मोठमोठ्या ट्रेलरमुळे वाहतुकीची कोंडी होत असून त्या ठिकाणी पार्किंगला परवानगीच कशी मिळते असा प्रश्न उपस्थित केला.

नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्डे तसेच ठिकठिकाणी संथगतीने सुरू असलेल्या कामांवरून लाेकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतली. महामार्गावरून प्रवासासाठी तासनतास लागत असल्याने वाहने मुंबईत सोडून रेल्वेने आलो आहोत. सोमवारी (दि. ८) सकाळी १० वाजता मुंबईत बैठक असून रेल्वेनेही जाणे शक्य होणार नसल्याची व्यथाच लाेकप्रतिनिधींनी व्यक्त केली. प्रवाशांच्या व्यथा लक्षात घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना बैठकीत का बोलविले नाही, असा जाबदेखील लोकप्रतिनिधींनी विचारला.

यावर पालकमंत्री भुसे यांनी ऑक्टोबर अखेरपर्यंत भिंवडी बायपासचे काम पूर्ण केले जाईल. तेथे १२ लेनचा रस्ता असून पोलिसांच्या मदतीला १०० अतिरिक्त कर्मचारी तैैनात केल्याची माहिती भुसे यांनी दिली. यासंदर्भात यंत्रणेला सुचना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

नाशिक-मुंबई महामार्गाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सोमवारी (दि.८) मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक बोलविली आहे. या बैठकीची माहिती मंत्रालय स्तरावर आधी मिळाली असती तर संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना देण्यात आली असती, ठाणे जिल्हाधिकारी यांनीही यासंदर्भात बैठक बोलावली असून मंत्रालयात उद्या होणाऱ्या बैठकीत मार्ग काढला जाईल.- दादा भुसे, पालकमंत्री

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस