शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

भाजीपाला कडाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 11:04 PM

सायखेडा : दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याने शेतातील उभी पिके करपली असून, शेतमालाची आवक घटली आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने आठवडे बाजारात शेतमाल अल्पप्रमाणात विक्र ीसाठी उपलब्ध होत असल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत.

ठळक मुद्देनिफाड परिसर : पाणीटंचाईमुळे पिके करपलीआवक घटल्याने

सायखेडा : दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याने शेतातील उभी पिके करपली असून, शेतमालाची आवक घटली आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने आठवडे बाजारात शेतमाल अल्पप्रमाणात विक्र ीसाठी उपलब्ध होत असल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. वाढते बाजारभाव शेतकऱ्यांना दिलासा देणारे असले तरी सर्वसामान्य माणसाच्या खिशाला न परवडणारे आहेत. आठवडे बाजार गरिबाच्या खिशाला महाग झाल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे.वर्षभर शेतमाल कवडीमोल भावात विक्र ी करावा लागला. अनेक शेतकऱ्यांना पिकासाठी लागणारे भांडवलदेखील वसूल झाले नाही. अनेक शेतकऱ्यांनी पिकविलेला माल विक्रीसाठी नेला नाही.डिसेंबर महिन्यापासून विहिरींनी तळ गाठला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असताना शेतीसाठी पाणी कुठून येणार? अशा परिस्थितीत उभी पिके सुकूनगेली. दोन-तीन महिन्यांपूर्वीचा परिणाम आज दिसू लागला आहे. आठवडे बाजारात शेतमालाची आवक घटली आहे. भाजीपाल्याचा तुडवडा निर्माण झाला आहे. बाजारात विक्र ीसाठी येणारी आवक घटल्याचा परिणाम बाजारभावावर झाला आहे. वर्षभर न मिळालेला भाव मिळत आहे, मोजक्या शेतकºयांना फायदा होत असला तरी सामान्य जनतेला आणि मजूरवर्गाला हे बाजारभाव न परवडणारे आहेत.दुष्काळाच्या झळा सामान्य माणसाच्या खिशाला बसत आहे. उन्हाळ्यात हाताला काम मिळत नाही, मजुरी नाही, शेतकºयांकडे पैसे नाही. अशा परिस्थितीत कुटुंब चालविण्यासाठी कसरत करावी लागत आहे.आठवडे बाजारात गगनाला भिडलेले भाजीपाल्याचे दर आज खिशाला महाग होत आहे. कोणताही भाजीपाला किमान ५० रुपये किलो दराच्या पुढे खरेदी करावा लागत आहे. उन्हाळा असल्याने हाताला काम मिळत नाही, त्यामुळे कुटुंब खर्च करणे अवघड झाले आहे.- रवींद्र शिंदे, भेंडाळीशेतकºयांकडे शेतमाल कमी झाला की बाजारभाव वाढतात, शेतमालाचे भाव स्थिर राहिले पाहिजे, शेतकºयांना कायम भाव मिळाला तर त्यांची आर्थिक परिस्थिती बदलेल. केवळ मालाचा तुडवडा आल्याने भावात तेजी आली नाही तर वर्षभर कवडीमोल भावात विक्र ी करावी लागली.- कैलास डेर्ले, शिंगवेआजचे बाजारभावमेथी २० रु . जुडीकोबी ३० रु . गड्डाफ्लॉवर ७० रु . किलोमिरची ८० रु . किलोदोडका ८० रु . किलोकारले ६० रु . किलोशेपू २० रु . जुडीटमाटे ४० रु . किलोगिलके ६० रु . किलो