शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

विजय मल्ल्यांचे कर्ज माफ केले

By admin | Published: November 19, 2016 12:08 AM

आता माझेही करा,सफाई कामगाराचे स्टेट बॅँकेला साकडे

नाशिक : भारतीय स्टेट बॅँकेने उद्योगपती विजय मल्ल्या यांचे १२०० कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, मी एक गरीब माणूस असून, सफाई कामगार आहे. त्यामुळे माझेही कर्ज याच धोरणानुसार माफ करावे, अशी मागणी त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत काम करणाऱ्या भाऊराव सीताराम सोनवणे या कर्मचाऱ्याने स्टेट बॅँकेच्या त्र्यंबकेश्वर शाखेकडे केली आहे.देशातील सर्वात मोठी बॅँक असलेल्या स्टेट बॅँक आॅफ इंडियाने देशातील ६३ बड्या उद्योगपतींचे सात हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. त्यात विदेशात पळून गेलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्या यांचा समावेश असून, त्यांचे एक हजार २०१ कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. लोकमतच्या या बातमीचा संदर्भ घेऊनच त्र्यंबकेश्वर येथील या सफाई कामगाराने स्टेट बॅँकेत हे पत्र दिले आहे. भाऊराव सोनवणे याने आपल्या मुलाच्या आजारपणासाठी दीड लाख रुपयांचे कर्ज काढले आहे. तीन वर्षे मुदतीचे हे कर्ज आहे. यासंदर्भात बॅँकेच्या शाखा व्यवस्थापकांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, भारतीय स्टेट बॅँक यांनी वैयक्तिक कर्ज उद्योगपती विजय मल्ल्या यांना भारतीय स्टेट बॅँकेचे असलेले १२०१ कोटी रुपयांचे कर्ज माफ केल्याचे लोकमत वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहे, ही बाब अत्यंत चांगली आहे. तरी मी आपणास विनंती करतो की, मी एक गरीब घरातील असून, नगर परिषदेत सफाई कामगार या पदावर काम करतो. ज्या अर्थी आपली बॅँक मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ करते, त्याचप्रमाणे माझे दीड लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज त्याच धोरणानुसार माफ करावे, ही विनंती असे नमूद करण्यात आले आहे. सोशल मीडियावरून हे पत्र व्हायरल झाले असून, सरकारचा उद्योगपतींना कर्जमाफी देण्याचा निर्णय आता सामान्यांना लागू करावा अशी टिप्पणी त्यावर होत आहे. (प्रतिनिधी)