शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान व्हावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 00:36 IST

विधानसभेचे पडघम वाजले असून, राज्यभरात निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या २१ तारखेला राज्यभरात मतदान होणार असून, उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघांत तयारी सुरू केली आहे.

वेळ : सायंकाळी ६.०० वाजता स्थळ : ज्येष्ठ नागरिक कट्टानाशिक : विधानसभेचे पडघम वाजले असून, राज्यभरात निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या २१ तारखेला राज्यभरात मतदान होणार असून, उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघांत तयारी सुरू केली आहे. उमेदवारांसाठी हक्काचे मत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनामध्येही विभानसभेच्या निवडणुकांविषयी कुतूहल बघायला मिळत आहे. त्यामुळे मखलमलाबाद येथील ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यावरही निवडणुकांविषयी सुरू असलेल्या चर्चेत त्यांनी ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.ज्येष्ठ नागरिकांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून नवनवीन पायंडे वापरण्यात येतात, असे मत एका ज्येष्ठांनी व्यक्त केले. त्यावर एकाने लोकप्रतिनिधी फक्त निवडणूक आली की येऊन पाया पडतात व मत मागतात, मात्र परत पाच वर्षे तोंड दाखवत नसल्याचे सांगितले. तसेच एकाने माझा या ईव्हीएम मशीनवर विश्वासच नसून मतदानाच्या वेळी मशीनवर नुसते बटण दाबतो मात्र ते मत कोणाला जाते हे कळत नाही त्यामुळे बॅलेट पेपरवरच मतदान व्हायला पाहिजे, असे सांगितले. त्यात एकाने उमेदवारांच्या पार्श्वभूमीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गुंडप्रवृत्तीच्या लोकांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी न देण्याचे मत मांडले. अशात एका १०० वर्ष वयाच्या ज्येष्ठाने सरकार कुणाचे येवो मात्र सर्वसामान्यांना कुठलाही फायदा होत नाही तसेच उमेदवारपण त्यांचे पोट भरण्यातच समाधान मानतात. यावर सर्वांनी याला दुजोरा देत हे अगदी बरोबर असल्याचे सांगितले. यावेळी जवळपास सर्वच ज्येष्ठांनी मतदानप्रकियेत बदल करून बॅलेट पेपरवरच मतदान घ्यायला हवे, असे मत मांडले.(या चर्चेत रामचंद्र पिंगळे, नारायण काकड, दत्तात्रय काकड, प्रताप काकड, नितीन काकड, संतोष काकड, दिनकर काकड, निवृत्ती पिंगळे आदींनी सहभाग घेतला.)लोकसभा निवडणुकीत भाजप सरकारने बहुमत मिळवत सरकार स्थापन केले. मात्र विरोधी पक्षांसह अनेक नागरिकांनीही याबद्दल संशय व्यक्त केला. यामुळे या ज्येष्ठ नागरिकांनीही ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त करत पुन्हा पूर्वीसारखे मतदान व्हायला हवे, असे मत मांडले. तसेच पूर्वी निवडणुकांसाठी एवढा पैसा खर्च केला जात नव्हता.मात्र आताचे राजकारणी पैशांच्या जोरावरच निवडून येत असून, त्यामुळे त्यांना सामान्य नागरिकांच्या प्रश्नांची जाणीव उरत नाही, अशा भावनादेखील व्यक्त करण्यात आल्या.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019EVM Machineएव्हीएम मशीन