शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
3
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
4
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
5
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
6
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
7
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
8
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
9
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
10
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
11
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
12
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
13
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
14
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
15
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
16
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
17
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
18
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
19
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
20
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मनसेचा कृती आराखड्याचा ‘उतारा’

By admin | Published: September 26, 2015 11:20 PM

बैठक : राज ठाकरे यांचे संकेत

नाशिक : राज्यातील दुष्काळ आणि टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भेडसावणारे प्रश्न आणि समस्या यासंदर्भात एकत्रित कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे. या कृती आराखड्यानुसार सरकारने त्वरित कार्यवाही न केल्यास मनसेच्या वतीने राज्यभर आंदोलन उभारण्यात येणार आहे.नाशिक येथील मनसेच्या राजगड या कार्यालयात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची व ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या व प्रश्न नेमके काय आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव दिला पाहिजे, पश्चिम वाहिनी नद्यांना पूर्व वाहिनी नद्यांना जोडण्यात यावे, स्वामिनाथन आयोगानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चावर आधारित ५० टक्केनफा देण्यात यावा, शेतकऱ्यांना सद्यस्थितीत बाजार भावानुसार कर्ज मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे बाजार भावाच्या मूल्यांकनानुसार ३० ते ४० टक्केकर्ज मिळावे, ते तूर्तास अत्यल्प प्रमाणात मिळते, दुष्काळ निवारण्यासाठी सरकारने एका समितीचे गठण करावे, यासह विविध मागण्यांचा उहापोह या बैठकीत झाल्याचे समजते. शेतकऱ्यांचे नेमके प्रश्न काय आहेत? त्यांची उत्तरे शोधू व त्यानंतरच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जन आंदोलन उभारू, अशी ग्वाही राज ठाकरे यांनी बैठकीत दिल्याचे समजते. यावेळी बैठकीत ग्रामीण जिल्हाध्यक्ष जि. प. सदस्य संदीप पाटील, अ‍ॅड. रतनकुमार इचम, शांताराम जाधव, शेखर पवार यांनी प्रश्न मांडल्याचे कळते. बैठकीस अविनाश अभ्यंकर, महापौर अशोक मुर्तडक, शहराध्यक्ष नगरसेवक राहुल ढिकले, जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे, शशिकांत जाधव, गटनेते अनिल मटाले, सलीम शेख, रमेश खांडबहाले, शरद शिंदे, मनोज ढिकले, दीपक पगार, हंसराज वडघुले, अतुल अहिरे, जगदीश अहिरे, डॉ. राजेंद्र शिरोडे, संदीप रौंदळ, राजेंद्र माळी, धोंडीराम बोरसे, मनोज सोनवणे, राकेश भामरे, कुंदन पाटील, अरुण दुगजे, जगन्नाथ गायकवाड, बबन जहागीरदार आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)