शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता
2
आता लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे? फडणवीस म्हणाले- काळजी करू नका, परत...
3
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
4
"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान
5
Bigg Boss Marathi 5 : रितेश देशमुखचे 'भाऊच्या धक्क्या'वर कमबॅक, ग्रँड फिनाले रंगणार ६ ऑक्टोबरला
6
Navratri Special: नीना कुळकर्णींची लेक सोहादेखील आहे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत, अभिनयात नाही पण...
7
सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनला मोठा दिलासा, उच्च न्यायालयाच्या आदेशाला SC ची स्थगिती; नेमकं प्रकरण काय?
8
सावधान! जास्त टोमॅटो खाल्ल्याने वाढते सांधेदुखी, चालणं होतं अवघड; 'या' समस्यांचा धोका
9
मारुतीची गाडी घेतली असेल तर सतर्क रहा; हा सोन्याएवढा मौल्यवान पार्ट चोरांच्या रडारवर
10
नवरात्र: अखंड दिवा अत्यंत शुभ, ‘या’ दिशेला लावा, अकाल मृत्यू टाळा; वाचा, अखंड ज्योत महत्त्व
11
मर्डर मिस्ट्री! विम्याचे पैसे हडपण्यासाठी बायकोचा काढला काटा; 'असा' रचला भयंकर कट
12
Navratri 2024: प्रतापगडावर दोन घट बसविण्याची परंपरा असलेले राज्यातील एकमेव मंदिर!
13
महायुतीचा प्लॅन! पुन्हा सत्तेत येण्याची रणनीती; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, आता...
14
पुराने उद्ध्वस्त केलं, लेकीच्या लग्नासाठी जमवलेलं सर्व सामान वाहून गेलं; डोळे पाणावणारी घटना
15
"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
16
Navratri 2024: नैवेद्यात ठेवा रोजचेच स्वयंपाक घरातले 'हे' जिन्नस, तरीही होईल देवीची कृपा!
17
माटुंग्यातल्या व्यापाऱ्याने अटल सेतूवरुन मारली उडी; पोलिसांना सापडला मृतदेह
18
वोटिंगनुसार 'हाच' विजेता, पण गेमनुसार... Bigg Boss Marathi 5 बद्दल शिव ठाकरेचा खुलासा
19
Navratri 2024: नवरात्रीत देवी भागवत पारायण केल्याने मिळते शेकडो पटीने पुण्य!
20
नवरात्र: तुमची रास कोणती? विशेष पूजा अन् नवदुर्गांना ‘हा’ नैवेद्य अर्पण करा; भरभराट होईल

एकलहरेचे पाणी देऊनही शहरावर पाणीकपातीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2016 11:55 PM

तिढा कायम : आज निर्णय होण्याची शक्यता

नाशिक : नाशिककरांवर आणखी पाणीकपात न लादता एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रासाठी आरक्षित ३०० दलघफू पाणी महापालिकेला देण्याचा निर्णय शासनाकडून घेतला जाण्याचे संकेत मिळत असले तरी या वाढीव पाण्यानंतरही शहरावर पाणीकपातीचे संकट कायम राहणार असल्याची गणिते मांडली जात आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून पाणीप्रश्नी कायम असलेला हा तिढा बुधवारी (दि.३) पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरात वाढीव पाणीकपात करायची की नाही, या मुद्द्यावरून महापालिकेतील सत्ताधारी आघाडी आणि भाजपा यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. गंगापूर धरणातील अत्यल्प पाणीसाठा लक्षात घेता आणखी पाणीकपातीचा आग्रह सत्ताधारी आघाडीने धरला आहे, तर भाजपाने पुरेसा पाणीसाठा असल्याने पाणीकपातीची गरज नसल्याची भूमिका कायम ठेवली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पाणीकपातीचा मुद्दा मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शासनाकडून महापालिकेसाठी एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रासाठी आरक्षित असलेल्या पाण्यातून ३०० दलघफू पाणी देण्याचा निर्णय घेतला जाण्याचे संकेत मिळाले असून, आमदार देवयानी फरांदे यांनीही त्यास दुजोरा दिलेला आहे. मात्र, एकलहरे केंद्राचे ३०० दलघफू पाणी देऊनही महापालिकेला नाशिककरांची ३१ जुलैपर्यंत तहान भागविण्यासाठी आणखी ३०० दलघफू पाण्याची गरज भासणार असल्याची आकडेवारी सत्ताधारी आघाडीकडून मांडली जात आहे. २७ जानेवारीला विभागीय आयुक्तांकडे झालेल्या बैठकीत सादर झालेल्या आकडेवारीनुसार, महापालिका गंगापूर धरणातून प्रतिदिन ११.३५ दलघफू पाणी उचलत असल्याचे सांगण्यात आले. त्यादिवशी गंगापूर धरण समूहात ३०६५ दलघफू पाणीसाठा शिल्लक होता. महापालिकेसाठी २७०० दलघफू पाणी आरक्षित ठेवण्यात आले असून, त्यातील १२०० दलघफू पाण्याची उचल झालेली आहे. त्यामुळे मनपासाठी १५०० दलघफू पाणी शिल्लक आहे. महापालिकेला १८६ दिवसांसाठी २१११ दलघफू पाण्याची गरज लागणार आहे. त्यामुळे शासनाने एकलहरे केंद्राचे ३०० दलघफू पाणी देऊनही महापालिकेला सुमारे ३०० दलघफू पाण्याची आणखी गरज भासणार आहे. म्हणजेच सुमारे २७ दिवस पाणी पुरणार नसल्याचे स्पष्ट होते. २७ दिवसांची तूट भरून काढण्यासाठी महापालिकेला वाढीव पाणीकपात करणे भागच पडणार असल्याची भूमिका सत्ताधारी आघाडीकडून घेतली जात आहे. सदर पाणीकपात ३५ टक्क्यांवर न्यायची की आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवून तूट भरून काढायची, एवढाच काय तो लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत सत्ताधारी आघाडीतील एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केले. (प्रतिनिधी)