शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

येवल्याच्या उत्तर-पूर्व भागात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 21:12 IST

सायगाव : सातत्याने दुष्काळी ठरलेल्या येवला तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात गेल्या पावसाळ्यात विक्रमी पर्जन्यमान होऊनही यंदा पाणीटंचाईच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. त्यातूनच शेतपिके वाचविण्यासाठी बोअरवेल्स, विहिरी खोदून पाण्याचा शोध घेण्यासाठी शेतकरीवर्गाची धडपड सुरू झाली आहे.

ठळक मुद्देशेतकरी हतबल : विहिरी, बोअरवेल्सवर लाखोंचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कसायगाव : सातत्याने दुष्काळी ठरलेल्या येवला तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात गेल्या पावसाळ्यात विक्रमी पर्जन्यमान होऊनही यंदा पाणीटंचाईच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. त्यातूनच शेतपिके वाचविण्यासाठी बोअरवेल्स, विहिरी खोदून पाण्याचा शोध घेण्यासाठी शेतकरीवर्गाची धडपड सुरू झाली आहे.तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातील शेती व्यवसाय विशेषत: निसर्गावरच अवलंबून आहे. पर्यायी पाटपाण्याची सुविधा नसल्याने या भागातील रब्बी हंगामातील पिकांना दरवर्षीच पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. शेतकरी खरीप हंगामातील मिळालेली मिळकत व कर्जावू घेतलेला पैसा रब्बीचे पिके वाचविण्यासाठी विहिरी व बोअरवेल खोदण्याचा केविलवाणा प्रयत्न वर्षानुवर्ष करत आला आहे.साठ फूट खोलीची विहीर खोदून बांधायची म्हटल्यावर चार ते पाच लाखांचा खर्च येतो. सरासरी दोनशे फूट बोअरवेल्स घ्यायचा तर १५ हजार रुपये लागतात. पर्यायी पाट पाण्याची सुविधा नसलेल्या उत्तर-पूर्व भागातून दरवर्षीकोट्यवधी रुपये खर्च होताना दिसतात. त्यात शंभरात एखाद्या विहिरीला अथवा बोअरला पाणी लागते, तेही दीर्घकाळ टिकेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे उत्तर-पूर्व भागातील सुमारे ६० खेड्यांतून दरवर्षी ३०० विहिरी नव्याने खोदल्या जातात तर हजारो बोअरवेल्स घेतले जातात.कोट्यवधींचा जुगारतालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४३८ मिलिमीटर इतके आहे. यंदाच्या हंगामात विक्र मी पर्जन्य होऊनही उत्तर - पूर्व भागाला आता पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी विहिरी, बोअरवेल्स वाढतच आहे. मात्र रब्बी हंगामाचे लागवड क्षेत्र वाढताना दिसत नाही. याचा अर्थ पाण्याच्या शोधार्थ नाशिबावर हवाला ठेवून शेतकरी दरवर्षी कोट्यवधीचा जुगारच खेळतो आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतwater shortageपाणीकपात