शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

गोदाकाठच्या गावांचा पाणीपुरवठा बंद

By admin | Published: August 05, 2016 2:04 AM

तत्काळ पंचनामे करण्याचा ठराव संमत : स्थायी समिती बैठक

नाशिक : जिल्ह्यात २ आॅगस्टला आलेल्या महापुरामुळे गोदाकाठच्या गावांचा पाणी व वीजपुरवठा खंडित झाला असून, त्याबाबत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव शासनाला पाठविण्यात यावा, असे महत्त्वपूर्ण ठराव गुरुवारी (दि. ४) संमत करण्यात आले.जिल्हा परिषदेची स्थायी समितीची बैठक अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. बैठकीस उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सभापती केदा अहेर, उषा बच्छाव, शोभा डोखळे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, सदस्य रवींद्र देवरे, प्रा. अनिल पाटील, प्रवीण जाधव, शैलेश सूर्यवंशी, कृष्णराव गुंड, गोरख बोडके आदि उपस्थित होते.रवींद्र देवरे यांनी जिल्ह्यातील पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीचे तत्काळ पंचनामे करावे. बांधकाम विभागाने झालेल्या इमारतीच्या नुकसानीचे तसेच लघुपाटबंधारे विभागाने अतिवृष्टीमुळे झालेल्या गावतळे, पाझरतलाव यांचे तत्काळ पंचनामे करावे, तसा अहवाल सादर करून जिल्हा नियोजन मंडळाकडे निधीसाठी पूरहानीतून मदतीचा प्रस्ताव पाठवावा, असा ठराव संमत केला. शैलेश सूर्यवंशी यांनी त्यात भर घालत उशिराने आलेल्या पावसामुळे आताच पेरण्या केलेल्या काही खरीप पिकांचे या अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रशासन आणि शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, तसेच पुरामुळे जेथे जेथे पाणीपुरवठा योजना बंद झालेल्या आहेत. तसेच वीजपुरवठा खंडित झाला आहे तो तत्काळ पूर्ववत करण्यासाठी कार्यवाही करण्याचा ठराव मांडला.पूरहानीमुळे ग्रामीण भागातील बहुतांश वीज पोल पडले असल्याचे, तसेच त्यामुळे वीजपुरवठा खंडित असल्याचे गोरख बोडके व प्रा. अनिल पाटील यांनी सांगितले.याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना विजयश्री चुंभळे यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यावेळी ठाकूर यांनी वीज साहित्य देखभाल दुरुस्तीसाठी १९३७ गावांपैकी १५०० गावांना प्रत्येकी साडेसहा लाखांचा असा एकूण १०२ कोटींचा निधी मंजूर असून, त्यातून लवकरच दुरुस्ती करण्यात येईल, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)