शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

आठवडे बाजार बंदचा निर्णय

By admin | Published: May 26, 2017 11:36 PM

सायखेडा : महाराष्ट्रातील शेतकरी १ जून रोजी बेमुदत संप पुकारणार असून, या संपाचे लोण निफाड तालुक्यात पसरले आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा : महाराष्ट्रातील शेतकरी १ जून रोजी बेमुदत संप पुकारणार असून, या संपाचे लोण निफाड तालुक्यात पसरले आहे. गोदाकाठ भागातील शेतकरी बेमुदत संपावर जाणार असल्याचा एकमुखी निर्णय म्हाळसाकोरे, भेंडाळी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.नगर जिल्ह्यातील पुणतांबा गावाने पुकारलेल्या संपाचे लोण पसरण्यास सुरुवात झाली असून, नाशिक जिल्ह्यात या संदर्भात तालुका, प्रत्येक गावनिहाय बैठकांचे नियोजन सुरू आहे. या बैठकीत गावातील भाजीपाला, दूध विक्र ी केले जाणार नाही. गावातील एकही दूध केंद्र या दिवसात सुरू असणार नाही. भेंडाळी, म्हाळसाकोरे येथील आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. संप काळात गावातील एकही गाडी शेतमाल घेऊन बाजार समितीत जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. यावेळी किसान क्र ांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक धोंडीराम रायते, जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश कमानकर, भेंडाळीचे सरपंच गोरख खालकर, म्हाळसाकोरेचे सरपंच सुधीर शिंदे, माजी सदस्य सोपान खालकर, शिवसेनेचे गटप्रमुख शरद खालकर उपस्थित होते.