शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

गोदावरीच्या  पुरामुळे बुधवारचा आठवडे बाजार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 11:07 PM

शहर व परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातून गोदावरी नदीला पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीच्या पुरामुळे दर बुधवारी भरणारा गंगाघाटावरचा आठवडे बाजार पूर्णपणे ठप्प झाला.

पंचवटी : शहर व परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातून गोदावरी नदीला पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीच्या पुरामुळे दर बुधवारी भरणारा गंगाघाटावरचा आठवडे बाजार पूर्णपणे ठप्प झाला.  गेल्या तीन दिवसांपासून गोदावरीला पूर कायम असून, रामकुंड, म्हसोबा महाराज तसेच गौरी पटांगणाला पुराच्या पाण्याने वेढल्यामुळे गंगाघाट परिसरात आठवडे बाजारात बसण्यासाठी जागाच शिल्लक नव्हती. केवळ बोटावर मोजण्याइतके व्यावसायिकच दाटीवाटीने नारोशंकर मंदिरासमोर तसेच रामसेतू पुलावरच काही भाजी विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. पुराच्या पाण्याने गंगाघाटावरील जुन्या भाजीबाजारातही शिरकाव केल्याने तेथील विक्रेत्यांनाही रस्त्यावर ठाण मांडावे लागले.बुधवारचा आठवडे बाजार विस्कळीत झाल्याने अंदाजे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. म्हसोबा महाराज, गौरी पटांगणावर पाण्याचे साम्राज्य असल्याने भाजीपाला व विविध व्यावसायिकांनी गणेशवाडी, आयुर्वेद महाविद्यालय, गणेशवाडी देवीमंदिरापर्यंत रस्त्यावर दुपारनंतर भाजीबाजार मांडला होता.  रामकुंडाशेजारी असलेले मनपा वाहनतळही पाण्याखाली गेल्याने देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांना गंगाघाट परिसरात मिळेल त्या ठिकाणी दुचाकी तसेच चारचाकी वाहने उभी करावी लागल्याचे चित्र दिसून आले.धार्मिक विधीसाठी अडचणबुधवारी सकाळनंतर पावसाने उघडीप दिली असली तरी, रामकुंडावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे विविध धार्मिक विधी करण्यासाठी आलेल्या स्थानिक तसेच परगावच्या भाविकांना नदीकाठावरच धार्मिक विधी उरकते घ्यावे लागले. दुपारी गंगाघाटावरील दुतोंड्या मारुती मूर्तीच्या कमरेपर्यंत पुराचे पाणी लागल्याने पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

टॅग्स :godavariगोदावरीMarketबाजार