शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

देशातील दुसºया क्रमांकाच्या लांबीच्या उड्डाणपुलाखाली दडलंय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:22 IST

देशातील दुसºया क्रमांकाच्या लांबीच्या उड्डाणपुलाखालील असलेल्या जागेला ग्रहण लागले आहे.

ठळक मुद्देशहरातील रहदारीवर ताण चौपाटीलगतही होणाºया गर्दीमुळे दुर्घटना

नाशिक : देशातील दुसºया क्रमांकाच्या लांबीच्या उड्डाणपुलाखालील असलेल्या जागेला ग्रहण लागले असून, अनधिकृत पार्किंग, कचराकुंडी आणि अतिक्रमणे होत आहेत. इतकेच नव्हे तर अनेक भिकाºयांसाठी ते आश्रयस्थान झाले असून, यात सुधारणा केव्हा करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरातून जाणाºया मुंबई-आग्रा रोडवर असलेल्या वाहतुकीच्या ताणामुळे शहरातील रहदारीवर ताण वाढतो आणि अपघातही होत असतात. त्यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला. उड्डाणपूल बांधण्यासाठी झालेला श्रेयवाद आणि त्यानंतर पुलाचा उपयोग किती झाला, बोगदा बंद करणे, रॅम्प उतरविण्याची ठिकाणे अशा अनेक विषयांवर चर्चा झडल्या. पुलाखालील जागेचा काय? असा देखील मुद्दा अभ्यासकांनी चर्चेत मांडला. त्यानंतर राज ठाकरे यांनी उड्डाणपुलाखालील जागेचा दुरुपयोग होऊन बकालपण वाढू नये यासाठी सुशोभीकरणाची कल्पना मांडली. त्यानुसार एका कंपनीने सामाजिक दायित्व निधीअंतर्गत कामे करण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार काही ठिकाणी शोभिवंत झाडे लावण्यात आली आणि काही भागांत पुलाखालील पिलर्सवर चित्रेही रेखाटण्यात आली. परंतु हे मोजक्या भागात. उर्वरित भागात जमेल त्या ठिकाणी जमेल ते सुरू आहे. काही ठिकाणी चक्क दुचाकी, चारचाकी आणि ट्रक सर्रास उभ्या केल्या जातात. वाहनतळासाठी मोफत जागा उपलब्ध झाल्याने अनेक व्यावसायिकांचे फावले आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी टपºया थाटल्या असून, पुलाच्या भिंतीलगतच चौपाटी साकारली आहे, तर काही ठिकाणी भिकाºयांची आश्रयस्थाने झाली आहेत. उड्डाणपुलाचे नेमके काय करायचे, सुशोभिकरण की वाहनतळ, चौपाटी की भिकाºयांचे आश्रयस्थान यावर कोणते धोरण ठरविण्यासाठी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाला वेळ नाही. त्यामुळे या पुलाचे नक्की काय होणार? हा प्रश्न आहे.अपघात झाल्यास जबाबदार कोण?पुलाखालील वाहने काढताना-ठेवताना अपघात घडू शकतो किंवा पुलाच्या भिंतीलगत असलेल्या चौपाटीलगतही होणाºया गर्दीमुळे दुर्घटना होऊ शकते. पुलाखालील जागेबाबत अशी दुर्घटना घडल्यानंतर निर्णय घेतला जाणार काय? असा प्रश्न आहे.