शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

रिक्षाचालकाने जवळचे भाडे नाकारले तर काय कराल?; शेअर रिक्षाही ठरतेय डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 16:21 IST

नाशिक : कोणत्याही शहराच्या प्रगतीत तेथील वाहतूक व्यवस्थेचे मोठे योगदान असते. मग ही व्यवस्था शहर बस, रिक्षा किंवा खासगी ...

नाशिक : कोणत्याही शहराच्या प्रगतीत तेथील वाहतूक व्यवस्थेचे मोठे योगदान असते. मग ही व्यवस्था शहर बस, रिक्षा किंवा खासगी स्वरूपाची असू शकते. मात्र, शहरातील प्रत्येक गल्लीबोळात शहर बसेस पोहोचणे शक्य नसल्याने सहाजिक रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. मात्र, बऱ्याच वेळा भाडे दरावरून प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये वादविवाद हाेतात. अनेक रिक्षाचालक मीटरप्रमाणे भाडे न आकारता मनमानी पद्धतीने भाडे ठरवतात. मीटर केवळ नावालाच लावलेले असते. जवळचे भाडे नाकारणे, प्रवाशांच्या खिशाचा अंदाज घेऊन भाडेदर ठरविणे, यांसह विविध अनुभव प्रवाशांना येतात. मात्र, वाढत्या इंधन दरामुळे स्वत:चे खासगी वाहन चालविणे परवडत नसल्याने नाइलाजाने रिक्षाचाच पर्याय निवडावा लागतो.

तोंड पाहून भाडे

प्रवासी बाहेरगावाहून आलाय की शहरातील आहे, यांचा अंदाज घेऊन काही रिक्षाचालकांकडून भाडे आकारले जाते. प्रवासी बाहेरून आला असल्यास त्यांच्या अज्ञानाचा फायदा आणि खिशाचा अंदाज घेऊनदेखील भाडे ठरविले जात असल्याचा अनेकांचा अनुभव आहे.

रिक्षामीटर शोभेलाच

शहरातील अनेक रिक्षांमध्ये मीटर लावलेले दिसून येतात. मात्र, प्रत्यक्षात त्याचा वापर केला जात नसल्याने हे मीटर केवळ शोभेसाठीच आहे की काय? असा प्रश्न पडतो. बहुतांश रिक्षांतील मीटर बंद पडलेले आढळते.

शेअर रिक्षा डोकेदुखी

वाढत्या महागाईमुळे अनेक प्रवाशांना स्वतंत्रपणे रिक्षा परवडत नाही. त्यामुळे बहुतांश वेळा शेअर रिक्षाला प्राधान्य देतात. मात्र, रिक्षाचालक प्रत्येक प्रवाशाकडून स्वतंत्ररीत्या भाडे आकारणी करतात.

वाढत्या महागाईचे कारण देत काही रिक्षाचालकांकडून परस्पर दरवाढ केली जाते. मात्र, शहरातील अनेक भागांतून शहर बससेवा नसल्याने आणि स्वत:चे खासगी वाहन परवडत नसल्याने नागरिकांना नाइलाजाने रिक्षाचाच पर्याय निवडावा लागतो.

- प्रशांत देसाई, नागरिक

शहराच्या प्रगतीत वाहतूक व्यवस्थेचे महत्त्वाचे स्थान असते. त्यात रिक्षाचालकांचादेखील मोठा वाटा असतो. त्यामुळे रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करून व्यवसाय करायला हवा. काही मूठभर चालकांमुळे सर्वांकडे पाहण्याची दृष्टी बदलते.

- प्रफुल्ल बिरारी, नागरिक

एखाद्या रिक्षाचालकाने भाडेदरावरून त्रास दिला, किंवा वाढीवर भाडे आकारल्यास प्रवाशाने सदर रिक्षाचा क्रमांक, वेळ, ठिकाण आदींबाबत आरटीओकडे लेखी, फोनवरून किंवा मेलद्वारे तक्रार करावी. विभागाकडून त्याची निश्चितपणे दखल घेतली जाईल.

- प्रदीप शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी)

 

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षा