शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

कृषीपंपांना दिवसा वीजपुरवठा मिळणार कधी...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2020 6:01 PM

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या महावितरण कंपनीकडून बऱ्याच वीज उपकेंद्रामधून शेतीसाठी रात्री ८ ते सकाळी ६ या वेळेत वीजपुरवठा केला जात असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये महावितरण कंपनीच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात असून, दिवसा कधी वीजपुरवठा होईल अशी विचारणा केली जात आहे.

ठळक मुद्देदिवसा उन्हाचे चटके अन‌् रात्री थंडी घेऊन बळीराजांच्या मेहनतीवर पाणी

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या महावितरण कंपनीकडून बऱ्याच वीज उपकेंद्रामधून शेतीसाठी रात्री ८ ते सकाळी ६ या वेळेत वीजपुरवठा केला जात असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये महावितरण कंपनीच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात असून, दिवसा कधी वीजपुरवठा होईल अशी विचारणा केली जात आहे. 

दिंडोरी तालुक्यात सध्या गहू, हरभरा तसेच कांदा लागवड चालू असल्यामुळे बळीराजाची धावपळ चालू असताना महावितरण कंपनीने कृषीपंपांना रात्रीचा वीजपुरवठा करून शेतकऱ्यांची गैरसोय केली आहे. त्यात रात्री विजेचा बिघाड झाल्यास तो दिवसही वाया जातो. त्याप्रमाणे ट्रान्स्फॉर्मरवर डीओ व फ्यूज वारंवार जात असल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यात कायमच अडथळे निर्माण होत आहेत.तालुक्यात गेल्या चार ते पाच वर्षांपासून बिबट्याचा मुक्तसंचार सर्वत्र पाहावयास मिळत आहे. त्यांची दखल वनविभाग घेत नाही, त्यात सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे शेतकरी वर्गापुढे मोठे संकट आहे. रात्री पिकाला पाणी दिले नाही. तर पीक वाया जाण्याची भीती आणि रात्री बाहेर निघायचे तर बिबट्याची भीती असे दुहेरी संकट बळीराजापुढे उभे राहिले आहे.सध्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना तीन दिवस दिवसा, तर चार दिवस रात्रीचा वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकरी हैराण आहे. संपूर्ण जग कोरोनासारख्या महामारीने ठप्प असताना आजही शेतकरी आपल्या शेतात राबत आहे. याची दखल कुठे तरी राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे.दिवसाही शेतात काम करायचे व रात्री पिकांना पाणी द्यायचे त्यामुळे शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येऊन अनेकांना व्याधींनी त्याला ग्रस्त केले आहे. अशी परिस्थिती असताना बळीराजाला कुणी वाली राहिलेला नाही, अशा स्वरूपाच्या तीव्र प्रतिक्रिया सध्या शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीelectricityवीज