शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
3
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
4
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
5
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
6
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
7
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
8
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
9
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
10
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
11
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
12
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
13
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
14
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
15
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
16
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
17
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
18
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
19
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
20
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 

एकदऱ्याचे पाणी कोणाच्या पदरात पडणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 23:48 IST

पेठ : एकदरे वळण बंधाºयाची जागा निश्चित झाल्यानंतर व स्थानिकांना कोणताही अपाय न होता धरणग्रस्तांना योग्य न्याय व मोबदला देण्याच्या सरकारी आश्वासनानंतर हा प्रकल्प उभा राहिल्यास याचे लिफ्ट होणारे पाणी नेमके कोणाच्या पदरी पडणार यावरून भविष्यात जल रणकंदन माजण्याची शक्यता निर्माण होणार असून, यामध्ये लोकप्रतिनिधींचा मात्र राजकीय कस लागणार आहे.

ठळक मुद्देगोदावरी की गिरणा मोसम पाण्यावरून भविष्यात श्रेयवादाची रंगणार लढत

रामदास शिंदे।पेठ : एकदरे वळण बंधाºयाची जागा निश्चित झाल्यानंतर व स्थानिकांना कोणताही अपाय न होता धरणग्रस्तांना योग्य न्याय व मोबदला देण्याच्या सरकारी आश्वासनानंतर हा प्रकल्प उभा राहिल्यास याचे लिफ्ट होणारे पाणी नेमके कोणाच्या पदरी पडणार यावरून भविष्यात जल रणकंदन माजण्याची शक्यता निर्माण होणार असून, यामध्ये लोकप्रतिनिधींचा मात्र राजकीय कस लागणार आहे.नाशिक जिल्ह्याचे क्षेत्र साधारणपणे गोदावरी व गिरणा अशा दोन प्रमुख खोºयांमध्ये विभागले गेले आहे. पेठ, सुरगाणा या दोन तालुक्यात आजही बºयापैकी सरासरीनजीक जाणारा पाऊस पडत असतो; याच तालुक्यापासून ५० किमी अंतरावर असलेल्या चांदवड, मालेगाव, नांदगाव तालुक्यात मात्र दुष्काळाचे सावट दिसून येत असते. त्यामुळे मांजरपाडापासून एकदºयापर्यंतच्या पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी अडवून सदरचे पाणी दिंडोरी व कळवण तालुक्यातील वळण बंधाºयात टाकल्यास नाशिक जिल्ह्यातीत सर्वच दुष्काळी तालुक्यांना या पाण्याचा फायदा होणार असून, वर्षांनुवर्ष दुष्काळाच्या छायेत अडकून पडलेल्या जनतेला दिलासा मिळणार आहे. यासाठी दुष्काळी तालुक्यातील जनतेने जागे होणे गरजेचे आहे.पाण्यासाठी संघर्षाची भूमिका ठेवून शासनाकडे पाठपुरावा करण्याची आवश्यकता निर्माण झालीआहे. एकदरे वळण बंधाºयाचे पाणी आंबेगणनजीक झारलीपाड्याच्या वळण बंधाºयाद्वारे वाघाड धरणात सोडण्यात यावे, अशी मागणी जोर धरत असून वाघाड, पालखेडमार्गे येवला, चांदवड, नांदगाव, मालेगावसारख्या तालुक्यांना सुजलाम् सुफलाम् होण्याचे स्वप्न साकार होण्यास मदत होऊ शकते. दुसरीकडे हेच पाणी गोदावरी खोºयात वळवून कश्यपी, गंगापूर धरणातूनसिन्नरमार्गे थेट जायकवाडीपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकप्रतिनिधींसह शासनाच्या वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.एकंदरीत एकदरे वळण प्रकल्पावर आगामी काळात स्थानिक जनतेसह स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, संघर्ष समिती यांना आपापल्या स्तरावर काम करण्याची गरज आहे. ( समाप्त )खासदारद्वयींची भूमिका महत्त्वाचीनाशिक जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ असून, नाशिक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिवसेनेचे हेमंत गोडसे, तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण करीत आहेत. एकदरे वळण बंधाºयाचे पाणी आपापल्या मतदारसंघात वळविण्यासाठी दोन्ही खासदारांचे प्रयत्न सुरू राहणार असून, यामध्ये कोण बाजी मारेल याकडेही संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पश्चिमवाहिनी प्रकल्प चर्चेला येणार आहेत. मागील आठवड्यात केंद्रीय जल आयोगाच्या पाहणी पथकाने पेठ तालुक्यातील एकदरे प्रकल्पाला भेट दिली. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकल्पाची निर्मिती झाल्यास सदरचे पाणी वाघाड धरणात वळविण्यासाठी आग्रह धरला आहे.