शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

बाळासाहेबांच्या पक्षप्रवेशाचा बार आपटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 23:08 IST

नाशिक : दिवाळी संपताच राजकीय फटाक्यांचे बार उडणे अपेक्षित होतेच. त्यानुसार त्याला सुरुवातदेखील झाली आहे. भाजपकडून राष्ट्रवादी आणि नंतर शिवसेनेत दाखल झालेल्या माजी आमदार बाळासाहेब सानप हे पुन्हा स्वगृही परतणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाचा बार कसा वाजणार? उडणार की आपटणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. सानप यांना पक्षात घेण्याविषयी मतभेद असल्याने आजतरी त्यांना स्वगृही परतणे सोपे नाही.

ठळक मुद्देशिवसेनेत घुसमटसमर्थनाबरोबरच विरोधही मोठा

संजय पाठक, नाशिक: दिवाळी संपताच राजकीय फटाक्यांचे बार उडणे अपेक्षित होतेच. त्यानुसार त्याला सुरुवातदेखील झाली आहे. भाजपकडून राष्ट्रवादी आणि नंतर शिवसेनेत दाखल झालेल्या माजी आमदार बाळासाहेब सानप हे पुन्हा स्वगृही परतणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाचा बार कसा वाजणार? उडणार की आपटणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. सानप यांना पक्षात घेण्याविषयी मतभेद असल्याने आजतरी त्यांना स्वगृही परतणे सोपे नाही.

सानप हे खरे तर मूळ काँग्रेस पक्षाचे ! पण भाजपात त्यांचे नशीब फळफळले आणि थेट महापौर झाले. त्यानंतर पक्षाला अधिक ‘अच्छे दिन’ आल्यानंतर थेट आमदार झाले. गेल्या पंचवार्षिक कारकिर्दीत तर मंत्रिपदाच्या स्पर्धेत कायम राहिले. अर्थातच, ते तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अत्यंत निकटवर्तीय असल्याने त्यांच्या शब्दाला इतके वजन वाढले की, संघटनात्मक शिस्तीमध्येदेखील संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी अनेकदा तडजोडी करून त्यांना सोयीची वाटतील असे निर्णय घेतले. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शहराध्यक्ष म्हणून उमेदवारी वाटप पूर्णत: त्यांच्या हाती होते. त्यानंतर महापालिकाच पूर्णत: त्यांच्या अधिपत्याखाली होती. मात्र, अशी सर्व अनुकूल स्थिती असतानाही त्यांच्याविषयी पक्षात रोष वाढत गेला आणि त्यांनी नंतर तर थेट तत्कालीन पालकमंत्री आणि तत्कालीन भाजप सरकारचे संकट मोचक गिरीश महाजन यांच्याशी वैमनस्य पत्करून संकट ओढवून घेतले. त्याची परिणीती त्यांची उमेदवारी कापण्यात झाली आणि त्यामुळेच बाळासाहेब सानप यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी करावी लागली. त्यातही अपयश आल्यानंतर त्यावेळी शिवसेनेने त्यांना चुचकारले आणि थेट शिवसेनेत ते दाखल झाले.

खरे तर सानप यांना उमेदवारी नाकारलेल्या समाजाचे प्रतिनिधित्व म्हणून शिवसेना खूप काही देईल. राज्यात भाजप सत्तेवर न आल्याने आता शिवसेना त्यांचा उपयोग नाशिकमध्ये भाजप डॅमेज करण्यासाठीच करेल त्यासाठी त्यांना जिल्हाप्रमुखपद किंवा विधान परिषदेवर संधी मिळेल अशा अटकळी होत्या. त्यातही सानप यांचा जीव आमदारकीत होता, असे सांगितले जाते. परंतु शिवसेनेने तसे काही केले नाही. भाजपा संस्कृतीशी नाळ जुळलेल्या सानप यांना येथे मात्र तसे काही न करता आल्याने त्यांची तेथेही घुसमट सुरू झाली, त्यातून आता स्वगृही परतण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून ते फिल्डिंग लावत असले तरी या साऱ्या गाेष्टी सोप्या नाहीत. पक्षात असतानाही सानप यांना ज्या पद्धतीने कामकाज केले त्यातून दुखावलेले मूळ भाजप कार्यकर्ते आजही सानप यांना अनुकूल नाही. शहरातील तीन आमदारांपैकी अपवादानेच कोणी सानप यांना पक्षात पुन्हा प्रवेश देण्यासाठी अनुकूल असेल अशी स्थिती आहे.

सानप यांचे संघ परिवाराशी चांगले संबंध असले तरी तरी नेमके ते कितपत तारतील याविषयी शंका आहे. मुळात सानप यांच्या पक्षप्रवेशाला प्रमुख अनुकूलता हवी ती गिरीश महाजन यांची ! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे मंत्री असलेले म्हणून महाजन यांचे नाव होते आणि त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत जेव्हा सानप यांना डावलून ॲड. राहुल ढिकले यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी फडणवीस यांनी थेट सानप यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते. त्यामुळे आता सानप दीड दोन वर्षांत कसे पावन झाले? असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ते आता काय निर्णय ‌घेतात हेदेखील महत्त्वाचे आहे.

टॅग्स :NashikनाशिकBJPभाजपाPoliticsराजकारणGirish Mahajanगिरीश महाजनBalasaheb Sanapबाळासाहेब सानप