शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राज ठाकरे नाशिकमध्ये फेरबदल करतील?

By संजय पाठक | Updated: December 10, 2020 21:28 IST

नाशिक : राज ठाकरे यांना सर्वाधिक साथ देणाऱ्या नाशिकमध्ये मनसेची अवस्था बिकट झाली आहे. पक्षातील ज्येष्ठांची संथ कामगिरी ही पक्षाला मारक ठरली आहे. शहरात कोणत्याही विषयावर पक्षाचे ज्येष्ठ स्वत: भूमिका घेत नाहीत आणि कार्यकर्त्यांनाही काही आंदोलने करू देत नाहीत, अशी काही वर्षांपासूनची अवस्था असून, तीच व्यथा पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मांडण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही संघटनेत फार मोठे बदल करण्यास ते पक्षाध्यक्ष राजी होतील काय, असा प्रश्न कायम आहे.

ठळक मुद्देधाडसी निर्णयाची गरजसंघटना कृतिशील करण्यावर भर हवा 

नाशिक : राज ठाकरे यांना सर्वाधिक साथ देणाऱ्या नाशिकमध्येमनसेची अवस्था बिकट झाली आहे. पक्षातील ज्येष्ठांची संथ कामगिरी ही पक्षाला मारक ठरली आहे. शहरात कोणत्याही विषयावर पक्षाचे ज्येष्ठ स्वत: भूमिका घेत नाहीत आणि कार्यकर्त्यांनाही काही आंदोलने करू देत नाहीत, अशी काही वर्षांपासूनची अवस्था असून, तीच व्यथा पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मांडण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही संघटनेत फार मोठे बदल करण्यास ते पक्षाध्यक्ष राजी होतील काय, असा प्रश्न कायम आहे.

महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागल्याने आता सर्वच राजकीय पक्ष सक्रिय होऊ लागले आहेत. पक्षीय स्तरावर बैठका आणि चर्चा सुरू होत असताना गेल्या चार वर्षांत ज्या समस्या किंवा महापालिकेतील कामकाजाचे कटू निर्णय आज वाटत आहेत, त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी सर्वच पक्ष अचानक जागरूक झाले आहेत. मनसेत मात्र वेगळीच तटस्थता आहे. त्याच पक्षात मोजक्याच नेत्यांच्या हाती सूत्रे असली तरी त्यांच्यात गटबाजी आहे. आक्रमक, कल्पक आंदोलने करणारा, प्रसंगी खळ्ळखट्याक करणारा पक्ष म्हणून मनसेची असलेली ओळख आता तशी राहिलेली नाही. त्यामुळेच आता पक्ष पुन्हा फाॅर्मात यावा, यासाठी युवा बिग्रेडची धडपड असून, ती गैरही नाही.

मनसेची स्थापना झाल्यानंतर वसंत गिते आणि अतुल चांडक हे पक्षाचे सर्वेसर्वा होते. ढिकले-गिते गटबाजीमुळे गिते यांना पक्षातून पद्धतशीरपणे हटवल्यानंतर पक्षाला त्याचा फटकाही बसला. परंतु, नंतर डॅमेज कंट्रोल झालाच नाही. त्यातच ज्यांच्या भरवशावर पक्ष सेाडला, ते राहुल ढिकलेही सत्तेचा कल बघून भाजपवासी झाले. त्यामुळे दांडगा जनसंपर्क असलेला मास लीडरशिप असलेला नेता पक्षाकडे नाही. आपल्याच कोशात असणारे नेते पक्षवाढीसाठी काहीही करत नाहीत की पक्षात नव्या कोणाला संधी देत नाहीत, अशी तक्रार आहे. त्यामुळे मूळ मनसेत असलेल्या आणि आता बाहेर गेलेल्या तसेच अन्य पक्षातील अनेकांना मनसे हा पर्याय वाटत असला तरी हे नेते आपल्याला जमू देतील काय, अशी चिंताही वाटत असते. त्यामुळे साहजिकच पक्षात येणारेही कचरत आहेत.

मुळात पक्षसंघटना कायम क्रियाशील राहिली पाहिजे. त्यासाठी संघटनात्मक कार्यक्रम आखले पाहिजेत. बळ असो नसो परंतु काही प्रमाणात निवडणुकाही लढल्याच पाहिजेत. परंतु असे काही हेाताना दिसत नाही. पक्षाच्या ठराविक नेत्यांची परवानगी असेल तरच आंदोलने किंवा त्यांनी सेन्सॉर केल्याप्रमाणेच आंदोलने अशी अवस्था आहे. अशावेळी पक्षाला नवीन उभारी कशी मिळणार, हा प्रश्न आहे. राज ठाकरे यांनी युवा पदाधिकाऱ्यांना व्यक्त होऊ दिले हे चांगलेच झाले. परंतु प्रदेश पातळीवरून देखील स्थानिक पातळीवर संपर्क यंत्रणा हवी, नवीन कार्यक्रम दिले जावेत; अन्यथा पक्षाचे साचलेपण दूर होणे अशक्य आहे. त्यामुळे जानेवारीत येणारे राज ठाकरे संघटनात्मक बदल, संपर्कासाठी यंत्रणा आणि संघटनेतील कार्यक्रमांचे सातत्य यासाठी काय करतील, हे बघणे महत्त्वाचे आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMNSमनसे