शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
2
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
3
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
4
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
5
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
6
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
7
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
8
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
9
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
10
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
11
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
12
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
13
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले
14
भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
15
महादेव ॲप प्रवर्तक चंद्राकरला अखेर बेड्या; दुबईत अटक, लवकरच होणार प्रत्यार्पण
16
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
17
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
18
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
19
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
20
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?

प्रबोधनाचे यश !

By किरण अग्रवाल | Published: September 16, 2018 1:54 AM

सुधारणेच्या गोष्टी कितीही सांगा, पण बऱ्याचदा पालथ्या घड्यावर पाणी... असाच अनुभव येत असल्याचे बोलून दाखविले जाते. काहीअंशी ते खरेही आहे, मात्र तुम्ही प्रबोधनाचा प्रयत्न किती प्रामाणिकपणे करता आणि कोणासमोर करता याला खूप महत्त्व असते; किंबहुना त्यावरच त्याचे यश अवलंबून असते.

सुधारणेच्या गोष्टी कितीही सांगा, पण बऱ्याचदा पालथ्या घड्यावर पाणी... असाच अनुभव येत असल्याचे बोलून दाखविले जाते. काहीअंशी ते खरेही आहे, मात्र तुम्ही प्रबोधनाचा प्रयत्न किती प्रामाणिकपणे करता आणि कोणासमोर करता याला खूप महत्त्व असते; किंबहुना त्यावरच त्याचे यश अवलंबून असते. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या बाबतीत तेच अनुभवास येत आहे ही बाप्पांचीच कृपा म्हणावी.बाप्पांचा उत्सव पर्यावरणपूरक ठरावा म्हणून गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. त्याला बºयाचअंशी यशही लाभत असून, ‘पीओपी’च्या मूर्तीऐवजी शाडूमातीच्या मूर्तीची मागणी वाढलेली दिसून आली. जलप्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने ही बाब खूपच महत्त्वाची ठरते आहे. विशेषत: शाळा-शाळांमधून याबाबत प्रबोधन केले गेले व शाडूमातीच्या मूर्ती घडविण्याच्या कार्यशाळा घेतल्या गेल्या. त्यामुळे मुलांनीच निर्णय घेऊन आपापल्या घरात शाडूमातीच्या मूर्तींची स्थापना करण्यात पुढाकार घेतल्याचे दिसून आले. महत्त्वाचे म्हणजे, यावर्षी तर त्याही पुढचे पाऊल टाकत मातीऐवजी कापूस, कागदापासून बनविलेल्या ‘इको-फ्रेण्डली’ गणेशमूर्ती साकारल्या गेल्याचेही बघावयास मिळाले. पूर्वी मखर वा सजावटीत मोठ्या प्रमाणात थर्माकोलचा वापर होताना दिसे, यंदा त्यातही लगाम बसलेला दिसत आहे. दुसरे म्हणजे, स्वच्छ व सुंदर गाव अथवा तंटामुक्त गाव योजनेप्रमाणेच ‘एक गाव, एक गणपती’ची संकल्पना राबविण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असून, त्यासही मोठा प्रतिसाद लाभत आहे. यंदा जिल्ह्यात सुमारे एक हजारपेक्षा अधिक गावांमध्ये ‘एक गणपती’ स्थापन करण्यात आले आहेत, हे मोठेच यश असून, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी त्यासाठी केलेली जनजागृती कामी आली आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवNashikनाशिक