शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

अवघ्या दीड तासात शहर जलमय

By admin | Published: June 15, 2017 1:00 AM

कोसळधार : रस्त्यावर साचले तळे, अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; तळमजले पाण्यात, बुधवार बाजारावर पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटासह बुधवारी (दि.१४) झालेल्या मुसळधार पावसाने नाशिककरांची त्रेधातिरपिट उडविली. शहरातील सर्वच रस्ते जलमय झाले होते, तर व्यापारी संकुलांसह रहिवासी सोसायट्यांचे तळमजले पाण्यात बुडाल्याने नागरिकांचे हाल झाले. शहरासह उपनगरीय भागातील पावसाळी भूमिगत गटारी पूर्णपणे तुंबल्याने शहरातील संपूर्ण रस्तेपाण्याखाली गेले होते.संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास शहरासह उपनगरीय भागांमध्ये ढगांचा गडगडाट सुरू झाला, याबरोबरच वाराही सुटला आणि पावसाला सुरुवात झाली. अवघ्या काही मिनिटांतच पावसाने जोर धरला. मुसळधार पावसाला शहर व परिसरात सुरुवात झाल्याने अर्ध्या तासातच सर्व भागातील रस्ते जलमय झाले होते. तसेच इमारतींचे तळमजले पाण्याने तुडुंब भरल्याने व्यावसायिकांसह नागरिकांची धावपळ झाली. बुधवारचा आठवडे बाजार असल्यामुळे गोदाकाठावरील विक्रेत्यांबरोबरच नागरिकांचे मोठे हाल झाले. विक्रेत्यांचे धान्य, भाजीपाला पाण्यात वाहून गेला, तसेच काही विक्रेत्यांचे पैशांचे गल्लेही वाहून गेले. तसेच गोदाकाठाभोवती असलेल्या दुचाकीदेखील पाण्यात वाहून गेल्याचे चित्र यावेळी पहावयास मिळाले. धान्यविक्रेत्यांचे धान्याची पोती वाहून गेली. पावसाचा जोर जरी जास्त असला तरी गोदाकाठावरील भुयारी गटारीचे चेंबर तुडुंब भरून वाहत होते. गटारी व नाल्याचे सांडपाणी मोठ्या प्रमाणावर वाहू लागल्याने बाजारात दुर्गंधीयुक्त पाण्याचे पाट वाहू लागल्याने नागरिकांनी महापालिकेच्या गलथान कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला. शहरातील गंगापूररोड भागातही केटीएचएम कॉलेजसमोर एका बाजूला तळे साचल्याने रस्ता बंद करण्यात आला. आयटीआय पुलाजवळ रस्त्यावरील पाण्यामुळे तासभर वाहतूक कोंडी झाली होती. सायंकाळच्या वेळी शासकीय आस्थापना आणि खासगी कार्यालयांची सुटी झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाले. इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस होईल याची कल्पना नसल्याने तयारी नसलेल्या नागरिकांना विविध व्यापारी संकुले आणि अन्य कार्यालयाचा आसरा घ्यावा लागला. अनेकांच्या दुचाकी तळ्यांमध्ये अडकल्याने त्यांना त्या बाहेर काढणे मुश्कील झाले होते. मुसळधार पावसामुळे अनेक मार्गांवरील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.पालिकेचे मुख्यालय असलेल्या शरणपूररोडवरील राजीव गांधी भवनसमोर सुमारे अर्धा फूट इतके पाणी साचले होते. यामुळे सुयोजित ट्रेड संकुलातील तळमजले पाण्यात बुडाल्याने तळमजल्यावरील दुकानदारांचे हाल झाले. पालिकेच्या दारात पाण्याचा तलाव साचून रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. या भागात नागरिकांनी चेंबर खुले करून दिल्याने काही प्रमाणात पाणी प्रवाही करण्यात आल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळाला.