शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
3
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
4
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
5
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
7
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
8
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
9
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
10
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
11
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
12
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
14
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
15
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
16
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
17
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
18
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
19
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
20
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक

सिंचन प्रकल्पाची कामे संथगतीने हेच दुर्दैव!

By admin | Published: November 03, 2015 11:58 PM

अशोक सोनवणे : ‘जल व्यवस्थापन’ विषयावर साधला संवाद

नाशिक : राज्यातील सर्व शहरे ही धरणांच्या पाण्यावर अवलंबून आहेत. तसेच ४८ टक्के वेगाने नागरीकरण होत असल्याने राज्याची तहान भागविणे हे फार मोठे आव्हान सरकारपुढे निर्माण झाले आहे. कारण महाराष्ट्रात सातत्याने कमी पाऊस होतो. त्यामुळे जोपर्यंत राज्यात सिंचन प्रकल्पांच्या कामांना वेग दिला जाणार नाही तोपर्यंत ‘पाणी युद्ध’ मिटणार नाही, असे प्रतिपादन जल व्यवस्थापन व कृषिशास्त्राचे अभ्यासक प्रा. अशोक सोनवणे यांनी केले.रोटरी क्लब आॅफ नाशिकच्या वतीने गंजमाळ येथील रोेटरी सभागृहात आयोजित व्याख्यानामध्ये सोनवणे बोलत होते. यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्रात शेतीशास्त्राचा सूक्ष्म अभ्यास होणे गरजेचे असून शेतीला किती पाणी द्यायचे अन् पाण्याचा वापर कसा करायचा यावर सखोल विचार होणे गरजेचे आहे. राज्यात समन्वयाचे पाणी वाटपाचे सूत्र बिघडल्यामुळे पाणी पेटले आहे. महाराष्ट्र हे शेती उत्पादन व पावसाबाबतीत तुटीचे राज्य राहिले आहे. महाराष्ट्र दुष्काळाचा सामना पन्नास-शंभर वर्षांपासून करत आला आहे, असे नाही तर शिवरायांच्या काळापासून या महाराष्ट्राने दुष्काळ अनेकदा बघितलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने शेतीच्या अर्थशास्त्राचा सूक्ष्म अभ्यास के ला आणि जल व्यवस्थापनाचे सूत्र मांडले ते अंमलात आणणे गरजेचे असल्याचे सोनवणे यावेळी म्हणाले.पावसाबाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो; मात्र भारतात होणाऱ्या पावसामध्ये प्रदेशनिहाय फरक जाणवतो. मेघालय, आसाम राज्यात तेरा हजार मिलिमीटर इतके पर्जन्यमान आहे, तर राजस्थान राज्यात शंभर ते दीडशे पर्जन्यमान आढळते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अंबोली परिसरात सहा ते सात हजार मिलिमीटर इतके पर्जन्यमान आहे, तर अहमदनगर जिल्ह्याच्या परिसरात १५० ते २०० इतक्या प्रमाणात पर्जन्यमानाची स्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राहणाऱ्या जनतेला आणि सरकारला नैसर्गिक जलसंपत्तीच्या वापराचे शास्त्र हे समजून घेतल्याशिवाय पर्याय नसल्याचे सोनवणे यांनी सांगितले. राज्यातील तीस हजार खेडी पाण्याचा दुष्काळाला सामोरे जाताहेत. यासाठी जमिनीची भूजल पातळी वाढविणे गरजेचे असून विपुल वृक्षसंपदा निर्माण करण्याची खरी गरज राज्याला आहे. कारण वृक्ष, गवतामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते आणि भूजल पातळी वाढते, असे ते यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)