शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
2
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
3
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
4
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
5
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
6
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
7
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
8
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
9
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
10
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
11
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
12
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
13
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
14
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
15
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
16
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
17
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
18
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
19
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
20
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी उड्डाण पुलाचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 01:08 IST

मालेगाव : शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी २१ कोटी ७२ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाचे काम गेल्या ३ वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. या कामामुळे नागरिकांना व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या वर्षात हा प्रकल्प पूर्णत्वास येणे गरजेचे होते; मात्र आता नववर्षातच मालेगावकरांसाठी उड्डाण पुलाचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. राजकीय कुरघोडी व उड्डाण पुलाच्या वाढीव कामाच्या खोडीमुळे काम संथगतीने सुरू आहे.

ठळक मुद्देआगामी वर्षात पूल वाहतुकीसाठी खुला करावा, अशी अपेक्षा मालेगावकरांकडून केली जात आहे.

मालेगाव : शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी २१ कोटी ७२ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाचे काम गेल्या ३ वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. या कामामुळे नागरिकांना व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या वर्षात हा प्रकल्प पूर्णत्वास येणे गरजेचे होते; मात्र आता नववर्षातच मालेगावकरांसाठी उड्डाण पुलाचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. राजकीय कुरघोडी व उड्डाण पुलाच्या वाढीव कामाच्या खोडीमुळे काम संथगतीने सुरू आहे.

उड्डाण पुलाच्या वाढीव कामाला शासनाने मान्यता द्यावी यासाठी प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आला आहे. शासनाच्या लालफितीत प्रस्ताव अडकल्याने मालेगावकरांना उड्डाणपुलाची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. शहराच्या पूर्व भागातील उपकार सिनेमागृह ते सखावत हॉटेलपर्यंत उड्डाणपुलाचे काम सध्या रखडत रखडत सुरू आहे. आत्तापर्यंत केवळ ६० टक्के काम झाले आहे. राज्य शासनाने या कामासाठी २१ कोटी ७२ लाख रुपये मंजूर केले आहेत. २५ सप्टेंबर २०१७ रोजी उड्डाण पुलाचा कार्यारंभ आदेश देऊन ठेकेदाराला दोन वर्षांची मुदत देण्यात आली होती. २४ सप्टेंबर २०१९ रोजी पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र ठेकेदाराने काम पूर्ण न केल्याने महापालिकेने पुन्हा ठेकेदाराला ६ महिन्यांची म्हणजे मार्च २०२० पर्यंतची मुदतवाढ दिली होती; मात्र सध्या मुदतवाढीची मर्यादा संपून ९ महिने उलटले आहेत. तरी देखील काम झाले नाही. लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाने लक्ष घालून आगामी वर्षात पूल वाहतुकीसाठी खुला करावा, अशी अपेक्षा मालेगावकरांकडून केली जात आहे.शहराच्या वैभवात भर टाकणारा मोठा प्रकल्प गेल्या काही वर्षापासून रखडला आहे. उड्डाणपुलाच्या कामामुळे शहरातील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. तसेच नवीन बसस्थानकात येणाऱ्या व जाणाऱ्या बसला मोकळा रस्ता उपलब्ध होणार आहे; मात्र रखडलेल्या या प्रकल्पामुळे मालेगावकरांच्या पदरी निराशा पडत आहे. वाहतूक कोंडीच्या व धुळीच्या समस्यांना नागरिक वैतागले आहेत.

टॅग्स :MalegaonमालेगांवTrafficवाहतूक कोंडी