शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जिल्हा परिषदेचे कार्यालय धूळ, जळमटांनी माखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 00:43 IST

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात २०१९-२०चे स्वच्छ सर्वेक्षण सध्या केले जात असून, त्यात गावागावांत साफसफाई करून त्याचे गुणांकन केले जात असतानाच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी अलीकडेच जिल्हा परिषदेच्या विविध कार्यालयांना तसेच पंचायत समित्यांना भेटी दिली असता, अनेक कार्यालये धूळ, जळमटांनी माखले असून, तुटलेले फर्निचर, अडगळीचे सामान पडलेले आढळून आल्याने दिव्याखाली अंधारासारखी परिस्थिती दिसून आली. त्यामुळे आगामी काळात सर्वच कार्यालयांची स्वच्छता करण्याचे आदेश भुवनेश्वरी यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देप्लॅस्टिकबंदी : सीईओकडून स्वच्छतेचे आदेश

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात २०१९-२०चे स्वच्छ सर्वेक्षण सध्या केले जात असून, त्यात गावागावांत साफसफाई करून त्याचे गुणांकन केले जात असतानाच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी अलीकडेच जिल्हा परिषदेच्या विविध कार्यालयांना तसेच पंचायत समित्यांना भेटी दिली असता, अनेक कार्यालये धूळ, जळमटांनी माखले असून, तुटलेले फर्निचर, अडगळीचे सामान पडलेले आढळून आल्याने दिव्याखाली अंधारासारखी परिस्थिती दिसून आली. त्यामुळे आगामी काळात सर्वच कार्यालयांची स्वच्छता करण्याचे आदेश भुवनेश्वरी यांनी दिले आहेत.गेल्या वर्षी जिल्हा परिषदेने स्वच्छ सर्वेक्षणात पहिला क्रमांक पटकाविला होता. त्यामुळे यंदाही हा क्रमांक कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे गावोगावी स्वच्छ सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत केले जात असलेले काम पाहण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी जिल्ह्यातील पंचायत समित्या, ग्रामपंचायतीच्या कार्यालयांना भेटी दिल्या असता, त्यात अत्यंत गलिच्छता आढळून आली आहे. अनेक ठिकाणी बंद असलेले संगणक, प्रिंटर अजूनही टेबलांवरच पडून असून, टेबल फॅन, कार्यालयातील ट्युबलाइट, कपाटे, नस्त्यांचे गठ्ठे अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. तसेच कार्यालयातील खोल्यांचे कोपरे, छताला धूळ, जळमटे लागल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याचे पाहून भुवनेश्वरी यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने सर्वच खात्यांना पत्र पाठवून महिन्याच्या दर तिसऱ्या शनिवारी दुपारी चार ते सहा वाजेपर्यंत प्रत्येक कार्यालयाने आपापल्या कार्यालयाची स्वच्छता करावी, असे आदेशही दिले आहेत. प्लॅस्टिक बंदीबाबत जागृतीकार्यालयातील स्वच्छतेप्रमाणेच सरकारने सिंगल यूज प्लॅस्टिकवर बंदी घातली असून, त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यामुळे प्लॅस्टिक बंदीबाबत जाणिव जागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दैनिक वापरामध्ये व कार्यालयातील कामकाजात प्लॅस्टिकचा वापर होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी केल्या आहेत.विजेचा कमीत कमी वापर व्हावा यासाठी कार्यालयातील विजेच्या उपकरणांचा वापर आवश्यक असेल तेव्हाच करावा व विजेची बचत करावी अशा सूचनाही या पत्रात देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदHealthआरोग्य