शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

० ते १६१ आमदार, १३ खासदार, २ राज्यात सरकार...; १२ वर्षात कसा होता 'आप'चा प्रवास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 13:54 IST

दिल्लीत सध्या आम आदमी पक्षात नवा चेहरा पुढे आला आहे. अरविंद केजरीवालांनी अतिशी यांना मुख्यमंत्रिपदाची धुरा दिली आहे. 

नवी दिल्ली - भ्रष्टाचाराविरोधातील लढाईतून जन्म झालेल्या आम आदमी पक्षाला आता भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करावा लागत आहे. आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे १५६ दिवस जेलमध्ये होते. जामीनावर बाहेर आलेले केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा कली आता जोवर जनता मला खुर्चीवर बसवणार नाही तोवर मी मुख्यमंत्री होणार नाही असंही त्यांनी सांगितले. 

आजपासून १२ वर्षापूर्वी अरविंद केजरीवाल त्या हजारोंच्या गर्दीतील एक घटक होते, जी दिल्लीच्या जंतर मंतरवर अण्णा हजारेंच्या आंदोलनात सहभागी होते. परंतु आज अरविंद केजरीवाल राष्ट्रीय राजकारणात एक महत्त्वाचा चेहरा बनले आहेत. भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारेंचं आंदोलन झालं होते. त्यावेळी अरविंद केजरीवाल सक्रीयपणे या लढ्यात उतरले होते. अण्णा हजारेंचं आंदोलन दिर्घकाळ चालले. 

२ ऑक्टोबर २०१२...

ही तीच तारीख आहे ज्यादिवशी अरविंद केजरीवाल यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. केजरीवाल यांनी अण्णांच्या आंदोलनाचा वापर राजकीय फायद्यासाठी केला असा आरोपही त्यांच्यावर झाला. मात्र देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी राजकारणात आलोय, सिस्टममध्ये घुसून आतील साफसफाई करू असं केजरीवाल आणि त्यांचे समर्थक बोलत होते. अखेर २६ नोव्हेंबर २०१२ रोजी अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी नावाच्या राजकीय पक्ष स्थापन केली. सर्व पक्षांनी विश्वासघात केला, सर्व पक्ष एकमेकांना मदत करतात. जोपर्यंत राजकारण बदलणार नाही तोपर्यंत भ्रष्टाचारमुक्त होणार नाही. त्यासाठी आम्ही आम आदमी पार्टीची स्थापन केली असं केजरीवालांनी म्हटलं.

२०१३ साली दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपने सर्व जागा लढण्याचं ठरवलं. त्यानंतर पहिल्याच निवडणुकीत दिल्लीत आपनं ७० पैकी २८ जागा विजयी होत सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांना धक्का दिला. अरविंद केजरीवालांनी तीन वेळा दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दिक्षित यांचा पराभव केला. त्यानंतर बहुमत न मिळाल्याने काँग्रेससोबत मिळून केजरीवाल सत्तेत आले. मात्र या आघाडीवर आरोप होऊ लागले तेव्हा अवघ्या ४९ दिवसांत केजरीवालांनी राजीनामा दिला. 

वर्षभर राष्ट्रपती राजवटीनंतर दिल्लीत निवडणुका झाल्या. त्यात अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकून बहुमत मिळवलं आणि स्वबळावर दिल्लीत सरकार स्थापन केले. फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. यावेळी ७० पैकी ६२ जागा आपने जिंकल्या. २०१५ च्या तुलनेत आमदारांची संख्या घटली परंतु पुन्हा बहुमत मिळवणं हे चमत्कारापेक्षा कमी नव्हतं.  

१० वर्षात राष्ट्रीय पक्षाचा दर्जा

२ वर्षापूर्वी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात १३ टक्के मते आपला मिळाली. त्याठिकाणी ५ जागा केजरीवालांच्या पक्षाने जिंकल्या त्यामुळे आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. सध्या दिल्ली आणि पंजाब याठिकाणी आम आदमी पक्षाचं सरकार आहे. दिल्लीत ६२, पंजाबमध्ये ९२, गुजरातमध्ये ५, गोवा असे एकूण १६१ आमदार आहेत. त्याशिवाय दिल्ली महापालिकेत आपची सत्ता आहे. संसदेत आपचे १३ खासदार आहेत त्यात लोकसभेत ३ आणि राज्यसभेत १० खासदार आहेत.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्लीanna hazareअण्णा हजारे