शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

१ लाख ३१ हजार कोटी रेल्वेसाठी !

By admin | Published: February 02, 2017 4:23 AM

रेल्वे प्रवास व मालवाहतुकीत ना कोणतीही भाडेवाढ, ना नव्या गाड्यांची घोषणा, केंद्रीय अर्थसंकल्पात विलिन झालेल्या रेल्वेविषयी अतिशय त्रोटक व निवडक घोषणा अवघ्या काही मिनिटांत

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली

रेल्वे प्रवास व मालवाहतुकीत ना कोणतीही भाडेवाढ, ना नव्या गाड्यांची घोषणा, केंद्रीय अर्थसंकल्पात विलिन झालेल्या रेल्वेविषयी अतिशय त्रोटक व निवडक घोषणा अवघ्या काही मिनिटांत अर्थमंत्री जेटलींनी लोकसभेत सादर केल्या. भारताच्या इतिहासात ९३ वर्षानंतर प्रथमच रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प नाही. अर्थमंत्री म्हणाले, रेल्वे, नद्या व रस्ते ही भारताची जीवनरेखा आहे. त्यात रेल्वेचे स्वतंत्र अस्तित्व संपले असून महामार्गांवरील वाहतूक, जलमार्ग, सागरी परिवहन यासह भारत सरकारच्या समग्र परिवहन धोरणाचा रेल्वे सेवा एक भाग बनली आहे. बजेट भाषणात रेल्वेशी संबंधित ज्या घोषणा केल्या, त्यात वर्ष २0१७/१८ मधे रेल्वेसाठी १ लाख ३१ हजार कोटींची तरतूद आहे. त्यापैकी ५५ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक केंद्र सरकार करणार आहे. (गेल्या वर्षी तरतूद १ लाख २१ हजार कोटी होती.)थोडक्यात रेल्वे बजेटमधे यंदा २२ टक्क्यांची वाढ आहे. अपघात टाळणे व प्रवासी सुरक्षेला सर्वाधिक महत्त्व देण्यासाठी यंदा १ लाख कोटी रुपयांच्या रेल्वे सुरक्षा निधी (रेल्वे सेफ्टी फंड) ची घोषणा करण्यात आली आहे. प्रतिवर्षी २0 हजार कोटी याप्रमाणे येत्या ५ वर्षांत अर्थसंकल्पाव्दारे त्याची भरपाई करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षा व लोहमार्गांवरील अपघात टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने केंद्र सरकारचे लक्ष ज्या महत्त्वपूर्ण विषयांकडे वेधले होते, त्यात जुन्या मार्गांचे नूतनीकरण, सिग्नल व्यवस्थेचे आधुनिकिरण, शक्तिशाली विद्युत लाइन्स टाकणे, टक्करविरोधी उपकरणे लावणे, स्लिपर्स बदलणे, मानवरहित रेल्वे क्रॉसिंग बाद करून नवे ओव्हरब्रिज बांधणे इत्यादी गोष्टींचा समावेश होता. अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात या सर्व बाबींचा उल्लेख केला नाही, मात्र प्रतिवर्षी रेल्वे सेफ्टी फंडव्दारे प्रतिवर्षी मिळणाऱ्या २0 हजार कोटींच्या निधीतून या प्रकल्पांची टप्प्याटप्प्याने पूर्तता करता येईल.भारतात ज्या मार्गांवर १00 गाड्यांची वाहतूक हवी, त्या रूटवर सध्या १५0 ते १६0 गाड्या धावत आहेत. अपेक्षेनुसार २0१९ पर्यंत डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचे काम पूर्ण झाले, तर गाड्यांच्या गर्दीमुळे मार्गांवरचे कंजेशन बऱ्यापैकी दूर होईल. तूर्त प्रवाशांच्या गर्दीची गैरसोय टाळण्यासाठी डबल डेकर ट्रेन्सचा पर्याय रेल्वेने स्वीकारला आहे.