शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

१० ग्रामपंचायती हगणदरीमुक्त जि.प.चे स्वच्छता अभियान : परिश्रम घेणारे पदाधिकारी, ग्रामस्थांचा सत्कार

By admin | Published: October 13, 2015 8:50 PM

जळगाव- हगणदरीमुक्त ग्रापंचायत संकल्पनेतून जिल्हाभरातील १० ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्या आहेत. स्वच्छ भारत अभियानाची जोड आणि पंतप्रधानांचे स्वच्छतेचे आवाहन यास प्रतिसाद देत या कार्यक्रमास गती मिळाली आहे.

जळगाव- हगणदरीमुक्त ग्रापंचायत संकल्पनेतून जिल्हाभरातील १० ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्या आहेत. स्वच्छ भारत अभियानाची जोड आणि पंतप्रधानांचे स्वच्छतेचे आवाहन यास प्रतिसाद देत या कार्यक्रमास गती मिळाली आहे. जिल्हाभरात २ ऑक्टोबरपासून स्वच्छतेसंबंधीचा कार्यक्रम राबवित येत आहे. निर्मलग्राम योजनेचे नाव बदलण्यात आले असून, स्वच्छ भारत मिशन हाती घेण्यात आले आहे. त्यातच हगणदरीमुक्त ग्रामपंचायत ही संकल्पना राबविण्यात येत आहे. ज्या गावात ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक शौचालये आहेत अशा गावांमध्ये १०० टक्के शौचालये तयार करून हगणदरीमुक्त गाव संकल्पनेला आकार दिला जात आह. पूर्वी प्रत्येक कुटुंबासाठी शौचालय निर्मिती करून निर्मल ग्राम संकल्पना राबविण्यात येत होती. २०१३ मध्ये निर्मलग्राम योजनेऐवजी स्वच्छ भारत मिशन हाती घेण्यात आले. त्यात मागील वर्षी हगणदरीमुक्त ग्रामपंचायत ही संकल्पना हाती घेण्यात आल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील यांनी दिली. जिल्हाभरात हगणदरीमुक्त ग्रामपंचायत अंतर्गत २०१५-१६ मध्ये अमळनेर तालुक्यातील आमोदे व सुंदरप˜ी, भुसावळमधील शिंदी, चाळीसगाव तालुक्यातील डामरून, खरजई व राहिपुरी, चोपडा तालुक्यातील करजाने, एरंडोलमधील आनंदनगर, यावल तालुक्यातील नावरे आणि मुक्ताईनगर तालुक्यातील वायले ही गावे हगणदरीमुक्त झाली आहेत. महात्मा गांधींना वंदन करून अभियानहगणदरीमुक्त गावांमध्ये २ ऑक्टोबरपासून विविध उत्सव, कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्यात २ रोजी संबंधित गावांमध्ये प्रभातफेरी काढण्यात आली. त्यातून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. त्यानंतर गावात अधिकार्‍यांच्याहस्ते हगदणरीमुक्त ग्रामपंचायत मोहिमेसाठी योगदान देणार्‍या काही ग्रामस्थांचा प्रतिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला. जिल्हाभरात ११५१ ग्रा.पं. आहेत. पैकी १२० ग्रा.पं. निर्मलग्राम योजनेत यशस्वी झाल्या आहेत. आता हगणदरीमुक्त गाव संकल्पनेत जे गाव कमी वेळेत हगणदरीमुक्त करणे शक्य आहे त्या गावावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यासंदर्भात संबंधित गावांमध्ये २५ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गटविकास अधिकारी व इतर अधिकारी आवर्जून त्या कार्यक्रमास प्रातिनिधीक स्वरुपात निवडलेल्या गावात उपस्थित होते. हगणदरीमुक्त गावांची तालुकानिहाय संख्या- अमळनेर- २, भुसावळ- १, चाळीसगाव- ३, चोपडा- १, एरंडोल- १, यावल- १, मुक्ताईनगर १.