शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

दिल्लीत बीएसएफचे चार्टर्ड विमान कोसळून १० ठार

By admin | Published: December 22, 2015 10:37 AM

दिल्लीतील द्वारका परिसरात बीएसएफचे चार्टर्ड विमान कोसळून १० जण ठार झाले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - राजधानी दिल्लीतील द्वारका परिसरात बीएसएफचे (सीमा सुरक्षा दल) चार्टर्ड विमान कोसळून झालेल्या अपघातात २ वैमानिकांसह विमानातील १० जण ठार झाले आहेत. रांचीला जाण्यासाठी दिल्ली विमानतळावरून आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास या विमानाने उड्डाण केले मात्र तांत्रिक बिघाडामुळे अवघ्या काही मिनिटांतच ते खाली कोसळले.
यावेळी विमानात २ वैमानिक व ८ अभियंते असे १० प्रवासी होते. अपघातानंतर विमानाला आग लागल्याने ते जळून पूर्णपणे खाक झाले असून विमानातील सर्व जण मृत्यूमुखी पडले. अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून ते आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
या घटनेची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग हे घटनास्थळी तातडीने रवाना झाले असून केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री महेश वर्मा यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.