शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

माजी अग्निवीरांसाठी केंद्रीय सशस्त्र दलात 10% पदे राखीव, गृह मंत्रालयाची मोठी घोषणा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 20:05 IST

केंद्र सरकारने अग्निपथ योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

Agnipath Scheme :केंद्र सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेबाबत (Agnipath Scheme) गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. यावरुन विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. आता या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने माजी अग्निवीर जवानांसाठी सर्व केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात कॉन्स्टेबलची 10 टक्के पदे राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, त्यांना शारिरीक चाचणीत शिथिलता दिली जाणार आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितल्यानुसार, अग्निवीराने आपला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्याला सीआयएसएप, बीएसएफ, सीआरपीएफ, आरपीएफ यांसारख्या केंद्रीय सशस्त्र दलात नोकरीची संधी दिली जाईल. त्यांच्यासाठी 10 टक्के पदे राखीव ठेवली जातील आणि शारीरिक चाचणीतदेखील शिथिलता दिली जाईल. 

याबाबत बीएसएफचे डीजी नितीन अग्रवाल म्हणाले, माजी अग्निवीर जवानांकडे चार वर्षांचा अनुभव असेल. ते पूर्णपणे शिस्तबद्ध आणि प्रशिक्षित असतील. बीएसएफसाठी हे खूप उपयुक्त ठरेल. छोट्या प्रशिक्षणानंतर त्यांना देशाच्या सीमेवर तैनात केले जाईल. तर, CISF च्या डीजी नीना सिंह यांनी सांगितले की, सीआयएसएफनेही यासंदर्भात सर्व तयारी केली आहे. CRPF चे डीजी अनिश दयाल सिंह यांनीदेखील भरती प्रक्रीयेची सर्व व्यवस्था केल्याचे सांगितले. शिवाय, अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला CRPF च्या वयोमर्यादेत 5 वर्षांची सवलत दिली जाईल, असेही ते म्हणाले.

एसएसबीचे डीजी दलजित सिंग यांनी म्हटले की, आमच्या दलात अग्नीवीरांसाठी 10 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. पहिल्या तुकडीसाठी 5 वर्षांची सूटही दिली जाईल. तसेच, त्यांना कोणतीही शारीरिक चाचणी द्यावी लागणार नाही. याशिवाय, आरपीएफचे महासंचालक मनोज यादव म्हणाले की, भविष्यात रेल्वे संरक्षण दलातील कॉन्स्टेबल पदासाठीच्या सर्व भरतींमध्ये माजी अग्नीवीरांना 10 टक्के आरक्षण असेल. माजी अग्नीवीरांना दलात घेताना आरपीएफ खूप उत्साही आहे. 

अग्निपथ योजनेचा वाद14 जून 2022 रोजी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली होती. अग्निपथ योजनेत 17 ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांना केवळ चार वर्षांसाठी सैन्यात नोकरी दिली जाईल. यातील 25 टक्के अग्निवीरांना पुढील 15 वर्षांसाठी कायम ठेवले जाईल. सध्या सरकारने याची वयोमर्यादा 23 वर्षे केली आहे. दरम्यान, या योजनेवरुन विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत आहेत.  नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या अधिवेशनादरम्यान विरोधकांनी अग्निपथ योजनेवरुन सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाcongressकाँग्रेस