शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

२५० कोटींच्या ठेवीसाठी १० हजार अर्ज बीएचआर पतसंस्था : ७०९ मालमत्तांचे १०७ कोटींचे अवार्ड

By admin | Published: July 14, 2016 9:35 PM

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेवर अवसायकांच्या नियुक्तीनंतर ठेवीदारांचा ठेवीसाठी तगादा सुरु झाला आहे. पतसंस्थेकडे १० हजार ठेवीदारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या ठेवीदारांची सुमारे २५० कोटींची रक्कम देणे आहे. दरम्यान,लवादकाच्या नियुक्तीनंतर ७०६ मालमत्तांचे १०७ कोटी रुपयांच्या रकमेचे अवार्ड करण्यात आले आहे.

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेवर अवसायकांच्या नियुक्तीनंतर ठेवीदारांचा ठेवीसाठी तगादा सुरु झाला आहे. पतसंस्थेकडे १० हजार ठेवीदारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या ठेवीदारांची सुमारे २५० कोटींची रक्कम देणे आहे. दरम्यान,लवादकाच्या नियुक्तीनंतर ७०६ मालमत्तांचे १०७ कोटी रुपयांच्या रकमेचे अवार्ड करण्यात आले आहे.
बीएचआर पतसंस्थेवर अवसायक जितेंद्र कंडारे यांची ऑक्टोबर २०१५ मध्ये नियुक्ती झाली आहे. नियुक्तीला ९ महिन्यांचा कालावधी उलटला असताना ठेवीदारांना अद्याप एक रुपयादेखील मिळालेला नाही. त्यामुळे ठेवीदार हवालदिल झाले आहेत.
१० हजार ठेवीदारांचे अर्ज
बीएचआर पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात ठेवीदारांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी तसेच तक्रार अर्ज घेण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी अवसायकांनी नियुक्त केले आहे. त्यानुसार जुलै महिन्यापर्यंत राज्यभरातील १० हजार ठेवीदारांचे अर्ज प्राप्त झाले आहे. या १० हजार ठेवीदारांचे सुमारे २५० कोटी रुपयांची रक्कम पतसंस्थेकडे घेणे आहे.
ऑडिट झालेल्या शाखांमध्ये ६५० कोटींच्या ठेवी
बीएचआर पतसंस्थेच्या १५० शाखांचे ऑडिट पूर्ण झाले आहे. तर १० शाखांचे ऑडिट हे अंतिम टप्प्यात आहे. १५० शाखांमध्ये तब्बल ६५० कोटी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. तर सुमारे ५५० कोटी रुपयांची कर्जवाटप झालेली आहे. उर्वरित शाखांमधील ऑडिट पूर्ण झाल्यानंतर सर्व शाखांमधील एकूण ठेवी आणि कर्जाची रक्कम याचा ताळमेळ बसणार आहे.

७०९ मालमत्तांचे १०७ कोटींचे अवार्ड
बीएचआर पतसंस्थेतून कर्ज घेऊन परतफेड न करणार्‍या कर्जदारांना लवादकांनी नोटीस काढल्या आहेत. त्यात ५५४ कर्जदारांकडील वसुलीसाठी अवार्डची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यानुसार वसुलीसाठी दरखास्त देण्यात आली आहे. १५२ कर्जदारांची अवार्डची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. एकुण ७०६ कर्जदारांच्या १०७ कोटी ३३ लाखांच्या मालमत्तांचे अवार्ड करण्यात आले आहे.

आठ कोटींची वसुली तरी ठेवीदार उपाशी
अवसायकांनी आतापर्यंत कर्जदारांकडून ८ कोटी रुपयांची कर्जवसुली केली आहे. तसेच वस्तू व मालमत्तांच्या विक्रीची निविदा काढली आहे. कर्जदारांकडून रकमेची वसुली होत असताना ठेवीदारांना मात्र ठेवी देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या रकमेतून वैद्यकीय उपचार, लग्न या कारणांना महत्त्व देत ठेवींचे वितरण केल्यास अनेकांना दिलासा मिळणार आहे. अवसायकांनी याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.