शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

खराब दारूगोळ्यावरील पैशांतून १०० तोफा खरेदी झाल्या असत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 06:17 IST

सहा वर्षांत ९६० कोटी रुपये खर्च : संरक्षण मंत्रालयाला अंतर्गत अहवाल सादर

नवी दिल्ली : सरकारची मालकी असलेल्या ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डाकडून गेल्या सहा वर्षांत खराब दर्जाचा दारूगोळा विकत घेण्यावर भारतीय लष्कराचा पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च झाला. या पैशांतून मध्यम पल्ल्याच्या १०० तोफा खरेदी करता आल्या असत्या, असा दावा संरक्षण मंत्रालयाला पाठविण्यात आलेल्या अंतर्गत अहवालात केला गेला आहे.

२०१४ ते २०२० दरम्यान आॅर्डिनन्स फॅक्टरी बोर्डाने खराब दर्जाचा दारूगोळा पुरवला. त्यामुळे ९६० कोटी रुपयांचे नुकसान झाले. ९६० कोटी म्हणजे एवढ्या पैशांमध्ये १५५ एमएम रेंजच्या मध्यम पल्ल्याच्या १०० तोफा खरेदी करता आल्या असत्या, असे हा अहवाल म्हणतो.बोर्डाचे कामकाज संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागांतर्गत चालते. जगातील ही एक जुनी सरकारचे नियंत्रण असलेली उत्पादन संस्था आहे. देशात आॅर्डिनन्सच्या फॅक्टरी आहेत. भारतीय लष्करासाठी दारूगोळा आणि शस्त्रास्त्र निर्मितीचे काम या कारखान्यांत चालते. २३ एमएम एअर डिफेन्स शेल, आर्टिलरी शेल्स, १२५ एमएम टँक राऊंड आणि रायफल्समध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या गोळ्यांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत.जीवितहानीही होते...आॅर्डिनन्स फॅक्ट्रीने केलेल्या या खराब दर्जाच्या उत्पादनामुळे फक्त आर्थिक नुकसानच झाले नाही, तर दारूगोळ्याच्या सुमार दर्जामुळे जे अपघात झाले, त्यात जीवितहानीही झाल्याचे अहवालात नमूद आहे. ‘कोणावर जबाबदारी निश्चित करता येत नाही आणि खराब दर्जामुळे वारंवार अपघात घडतात. यामुळे सैनिक जखमी होतात, त्यांचा मृत्यू होतो. सरासरी दर आठवड्याला एक अपघात होतो’, असेही अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहDefenceसंरक्षण विभाग