शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

ना घर मिला ना घरवाली! पंतप्रधान आवास योजनेचे पैसे घेऊन ११ महिला बॉयफ्रेंडसोबत पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 12:32 IST

काही महिलांनी पंतप्रधान आवास योजनेचे पैसे घेतल्यावर असं काही केलं जे समजल्यावर उत्तर प्रदेश सरकारही हैराण झालं आहे.

प्रत्येक गरीब व्यक्तीच्या डोक्यावर छत असावं, यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लोकांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. पण काही लोकांनी किंवा अधिकाऱ्यांनी पंतप्रधान आवास योजनेच्या पैशांचा गैरवापर केल्याच्याही घटना घडल्या आहे. पण उत्तर प्रदेशात एक अजब घटना समोर आली आहे. 

काही महिलांनी पंतप्रधान आवास योजनेचे पैसे घेतल्यावर असं काही केलं जे समजल्यावर उत्तर प्रदेश सरकारही हैराण झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील 11 महिला पंतप्रधान आवास योजनेच्या पहिल्या हप्त्याचे पैसे घेऊन आपल्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्या. हे अनोखं प्रकरण असून संपूर्ण विभागात खळबळ उडाली आहे. प्रशासनासोबतच ही घटना सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल होत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या लोकांच्या पत्नी पैसे घेऊन बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्या आहेत, त्यांनी या घटनेची माहिती अधिकाऱ्यांना दिली आहे. अडचण अशी आहे की, या लोकांना घर बांधण्यासाठी मिळणारा पहिला हप्ता घेऊन महिला पळून गेल्या, आता प्रशासनाने त्यांचा दुसरा हप्ताही थांबवला आहे. आता हे लोक अशा अवस्थेत सापडले आहेत की त्यांना ना घर मिळत आहे ना बायको.

उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या अहवालानुसार जिल्ह्यातील सुमारे २,३५० लोकांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पैसे मिळाले आहेत. यातील बहुतांश लाभार्थी महाराजगंजमधील ठूठीबारी, शितलपूर, चटिया, रामनगर, बकुल डीहा, खसरा, किशूनपूर आणि मेधौली गावातील आहेत. यातील अनेक घरांचं बांधकाम पूर्ण झालं आहे.

दोन हजार लाभार्थ्यांपैकी सुमारे ११ महिलांनी पंतप्रधान आवास योजनेचा ४० हजार रुपयांचा पहिला हप्ता घेऊन आपल्या नवऱ्यांना सोडल्याची माहिती मिळत आहे. या महिलांनी पैसे घेऊन बॉयफ्रेंडसह पळ काढला. पंतप्रधान योजनेअंतर्गत गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना कायमस्वरूपी घरं बांधण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत मिळते. कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीनुसार निधीचे वाटप केले जाते. 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाUttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नMONEYपैसा