शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

भारतात येत्या २० वर्षांत १२ कोटी मधुमेही

By admin | Published: April 07, 2017 4:54 AM

भारतात येत्या २० वर्षांत मधुमेहींची संख्या १२ कोटींपर्यंत जाणार आहे. सध्या ही संख्या सात कोटी (७० दशलक्ष) आहे

हैदराबाद : भारतात येत्या २० वर्षांत मधुमेहींची संख्या १२ कोटींपर्यंत जाणार आहे. सध्या ही संख्या सात कोटी (७० दशलक्ष) आहे, असे इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ पब्लिक हेल्थने (आयआयपीएच) म्हटले. प्रत्येक मधुमेही आपला आजार व त्यामुळे होणारी गुंतागुंत नियंत्रणात राखण्यासाठी दरवर्षी सरासरी २५ हजार रुपये खर्च करतो, असे येथील आयआयपीएचचे संचालक जीव्हीएस मूर्ती यांनी गुरुवारी सांगितले. सात एप्रिल या जागतिक आरोग्य दिनानिमित्त ते बोलत होते. 673 अब्ज डॉलर एवढा खर्च मधुमेहामुळे जगभरात दरवर्षी होतो आहे. सरकारच्या तसेच वैयक्तिक पातळीवरील खर्च वाढला आहे. 50% मूर्ती यांच्या म्हणण्यानुसार, मरण पावणाऱ्या प्रौढांतील ५० टक्के हे मधुमेहाचे बळी असतात. >भारतात किती येतो खर्च?भारतात एका मधुमेहीला या आजाराचे व्यवस्थापन करण्यास वर्षाला अंदाजे सरासरी २५ हजार रुपये खर्च येतो. त्या रुग्णाला या आजारामुळे आणखी काय काय आरोग्यविषयक तक्रारी आहेत, त्यानुसार या खर्चामध्ये बदल होतात. भारतात दुर्दैवाने मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी होणाऱ्या खर्चाला विम्याचे छत्र उपलब्ध नाही, असे मूर्ती म्हणाले. आयुष्यभर औषधोपचारमधुमेहीला आयुष्यभर औषधोपचार घ्यावे लागतात. मधुमेह नियंत्रणात राहिला नाही तर डोळे, मूत्रपिंड असे अत्यंत महत्वाचे अवयव बाधित होऊ शकतात. त्यामुळे रुग्णांना आधीच त्याबद्दलचे धोके व औषधोपचार सांगितला गेला पाहिजे, असे जीव्हीएस मूर्ती यांनी म्हटले.