शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

१२ मंत्र्यांना भोवले वाद

By admin | Published: July 07, 2016 4:05 AM

केंद्रीय मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा फेरबदल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांतील कामगिरीच्या आधारावर तब्बल १२ केंद्रीय मंत्र्यांचे खातेपालट करून मला कोणीही गृहीत धरू नका, असा

- हरीश गुप्ता, नवी दिल्ली

केंद्रीय मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा फेरबदल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांतील कामगिरीच्या आधारावर तब्बल १२ केंद्रीय मंत्र्यांचे खातेपालट करून मला कोणीही गृहीत धरू नका, असा स्पष्ट संदेशच दिला आहे. त्यांनी दहा राज्यांतील १९ नवीन चेहऱ्यांना संधी देताना, पाच मंत्र्यांना वगळले असले तरी या धक्क्याचा अनेक केंद्रीय मंत्र्यांवरही परिणाम झाला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अजिबात संघर्ष नको, असे संकेतही पंतप्रधानांनी दिले आहेत.संसदीय कामकाजमंत्री म्हणून त्यांनी अनंतकुमार यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. व्यंकय्या नायडू यांच्या आक्रमकतेच्या तुलनेत अनंतकुमार मृदू आहेत. त्यामुळे फ्लोअर मॅनेजमेंट सोपे होईल, असा त्यांचा होरा असावा. तथापि, अरुण जेटली यांच्याकडील माहिती व प्रसारण खाते नायडू यांच्याकडे देण्यात आले. अधिवेशनात वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) विधेयक संमत करून घेण्याचा पंतप्रधानांचा इरादा आहे. ते आतापर्यंत करून घेण्यात जेटली यांचे प्रयत्न कमी पडले होते. कमी महत्त्वाची खाती देऊन प्रसंगी पुढच्या वेळी तुमचीही गच्छंती केली जाईल, असे संकेत पाच राज्यमंत्र्यांना देण्यात आले आहेत.खातेपालटामागची कारणमीमांसा...स्मृृती इराणी : पदवी, जेएनयू, रोहित वेमुला आत्महत्या आदी प्रकरणांशी संबधित वादामुळे मनुष्यबळ विकास हे वजनदार खाते काढून घेऊन स्मृती इराणी यांच्याकडे वस्त्रोद्योग खाते देऊन त्यांना पदावनत करण्यात आले. जवळीक नव्हे तर कामगिरीच पाहिली जाईल, असे संकेतही देण्यात आले आहेत.सदानंद गौडा कामगिरीचा आलेख घसरल्याने सदानंद गौडा यांचे कायदा खाते काढून त्यांना कायदा व सांख्यिकी आणि अंमलबजावणी खाते देण्यात आले.वीरेंद्र सिंह : सर्वात मोठा धक्कादायक बदल म्हणजे वीरेंद्र सिंग यांच्याकडील ग्रामीण विकास, स्वच्छता, पेयजल, पंचायत राज खाते काढून त्यांच्याकडे पोलाद खाते देण्यात आले. त्यांच्याकडे चार मंत्रालये होती. आता फक्त पोलाद (खाण वगळून) खाते देण्यात आले, तर बढती न करता पीयूष गोयल यांच्याकडे खाण या खात्याचा अतिरिक्त प्रभार देत त्यांचे समाधान करण्यात आले आहे.रविशंकर प्रसाद : कॉल ड्रॉप्स समस्येमुळे रविशंकर प्रसाद यांना महत्त्वाचे दळणवळण मंत्रालय गमवावे लागले असले, तरी माहिती व तंत्रज्ञान कायम ठेवून कायदा मंत्रालयाचा अतिरिक्त प्रभार देत त्याची भरपाई करण्यात आली आहे.राजीव प्रताप रुडी : कौशल्य विकासमंत्री राजीव प्रताप रुडी यांनाही कामगिरीची मोजपट्टी लावत संसदीय कामकाज या खात्याचा अतिरिक्त प्रभार गमवावा लागला.जन. व्ही. के. सिंग : भलतेसलते बोलून स्वत:सह सरकारलाही अडचणीत आणणारे जन. व्ही. के. सिंग यांनाही सांख्यिकी, अंमलबजावणी खात्याच्या स्वतंत्र प्रभार गमावून किंमत मोजावी लागली. आता त्यांच्या सोबतीला ए. जे. अकबर यांचाही विदेश राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आल्याने सिंग यांना स्वभावाला मुरड घालावी लागेल.संतोष गंगवार : गंगवार यांच्याकडे वस्त्रोद्योग खात्याचा स्वंतत्र प्रभार होता. त्यांना आता अरुण जेटली यांच्या हाताखाली वित्त मंत्रालयात पाठवून मोठा धक्का दिला आहे.शहा यांचा वरचष्मा!केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा वरचष्मा दिसून आला. विस्ताराबाबत महिनभरापासून खलबते चालली असली तरी यावेळी पंतप्रधान मोदी हे नव्याने केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेल्या एकाही मंत्र्यांला भेटले नाहीत. या नव्या मंत्र्यांना भेटण्याची जबाबदारी पंतप्रधानांनी अमित शहा यांच्यावर सोपविली होती. नंतर अरुण जेटली यांनी शहा यांच्याशी चर्चा केली; परंतु या सर्व घडामोडीत पंतप्रधान मोदी पडद्याआडच राहिले.