शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

लग्नमंडपात पसरली शोककळा; मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू, 15 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 08:40 IST

मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात रविवारी ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात चार मुलांसह 13 जणांचा मृत्यू झाला.

मध्य प्रदेशमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात रविवारी ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात चार मुलांसह 13 जणांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री आठच्या सुमारास राजगड येथील पिपलोडी येथे लग्नाच्या वराती दरम्यान हा अपघात झाला. या अपघातात एकूण 15 जण जखमी झाले आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने जिल्हा प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितलं की, राजस्थानमधील मोतीपुरा येथून वरात कुलमपूरकडे जात होती. राजस्थानच्या सीमेला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील राजगडमध्ये हा अपघात झाला.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. जिल्हाधिकारी हर्ष दीक्षित, पोलीस अधीक्षक आणि मंत्री नारायण सिंह पनवार घटनास्थळी उपस्थित होते. "आम्ही राजस्थान सरकारच्या संपर्कात आहोत आणि राजस्थान पोलीसही घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींवर राजगडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही गंभीर जखमींना भोपाळला रेफर करण्यात आले आहे" असं म्हटलं आहे. 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावर शोक व्यक्त केला आणि आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दु:खद आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत ,मी त्या कुटुंबांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करते. जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करते."

मध्य प्रदेशातील सतना येथे राष्ट्रीय महामार्गावर एक अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. सतना येथे दुभाजकाला धडकून कार उलटली. कारमध्ये 5 जण होते, त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. कारमधील लोक वाढदिवस साजरा करण्यासाठी रेवा येथे जात होते, मात्र त्यांच्या कारला रामपूर बघेलानजवळ अपघात झाला.

टॅग्स :AccidentअपघातMadhya Pradeshमध्य प्रदेश