शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

१४ मच्छीमारांना वाचविले

By admin | Published: February 08, 2016 4:31 AM

उत्तर गोव्याच्या किनाऱ्यापासून सुमारे ८0 किलोमीटरवर खवळलेल्या खोल समुद्रात बुडणाऱ्या ट्रॉलरवरील १४ मच्छीमारांचे प्राण तटरक्षक दलाने वाचविले

वास्को (गोवा) : उत्तर गोव्याच्या किनाऱ्यापासून सुमारे ८0 किलोमीटरवर खवळलेल्या खोल समुद्रात बुडणाऱ्या ट्रॉलरवरील १४ मच्छीमारांचे प्राण तटरक्षक दलाने वाचविले. कन्याकुमारीतील ‘निक्सिमोळ’ ट्रॉलरमध्ये पाणी शिरले असून, तो बुडण्याच्या मार्गावर असल्याची माहिती तटरक्षक दलाच्या मुंबईतील मुख्यालयास शनिवारी रात्री १०च्या सुमारास मिळाली. त्यानंतर तातडीने हालचाली करण्यात आल्या. मुरगाव बंदरातील आयसीजीएस सी ४१0 नौका गोव्यातून रात्री मदतकार्यासाठी तातडीने रवाना झाली. ट्रॉलरपर्यंत पोहोचेपर्यंत तटरक्षक दलाचे जवान मच्छीमारांशी तसेच ट्रॉलरच्या मालकाशी सतत संपर्कात होते. ट्रॉलरमध्ये पाणी शिरू लागले होते, ते काढून टाकण्यासाठी खलाशांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या; पाणी इंजिनपर्यंत पोहोचले असते तर ट्रॉलर बंद पडून १४ही मच्छीमार बुडाले असते. ११ मच्छीमारांना तटरक्षक दलाच्या नौकेत घेण्यात आले आणि तीन मच्छीमारांना ट्रॉलरवर ठेवून तो ओढत पहाटे ५.१५च्या सुमारास गोवा बंदरात आणण्यात आला.तटरक्षक दलाचे उपकमांडर करण किशोर यांच्या नेतृत्वाखाली ए.के. शर्मा, एम. बॅनर्जी, बी. सेल्वाराज, आर.के. शर्मा, मुकेश कुमार, प्रवीण कुमार, व्ही.पी. प्रभू, एम.बी. मूर्ती आणि एम. मणिकंदन यांनी मदतकार्य राबविले.