शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

ट्रक कालव्यात कोसळून उत्तर प्रदेशात १४ ठार

By admin | Published: May 06, 2017 1:08 AM

टिळ्याच्या कार्यक्रमानंतर घरी परतणाऱ्या लोकांचा छोटा ट्रक कालव्यात कोसळून १४ ठार, तर २८ जण जखमी झाले. उत्तर प्रदेशात

एटा (उत्तर प्रदेश) : टिळ्याच्या कार्यक्रमानंतर घरी परतणाऱ्या लोकांचा छोटा ट्रक कालव्यात कोसळून १४ ठार, तर २८ जण जखमी झाले. उत्तर प्रदेशात शुक्रवारी ही भयंकर दुर्घटना घडली. हा ट्रक आग्रा येथून परतत असताना जलेसर भागातील सराई नीम येथे पहाटे ३ वाजता ही दुर्घटना घडली. दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबियांनी प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान घोषित केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये, गंभीर जखमींना ५० हजार रुपये, तर किरकोळ जखमींना २५ हजार रुपयांची भरपाई घोषित केली. गिरंद सिंह (६५), प्रशांत (१२), लवकुश (२१), मुकेश (२३), नेरापाल (२५), पद्मसिंह (५०), ओमवीर (१९), शैतानसिंह (५०), पद्मसिंह (४०), बनीसिंह (४५), राजेंद्र (६०), विजय (२२), परवेंद्र फौजी (३५) आणि संजू (२५), अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व जण जागीच ठार झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.२८ जखमींपैकी १६ जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी आग्रा येथे पाठविण्यात आले आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली.  (वृत्तसंस्था)