शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या भूस्खलनात 14 जणांचा मृत्यू

By admin | Published: July 11, 2017 7:07 PM

अरुणाचल प्रदेशातील पापुम परे जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनात 14 लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमत
इटानगर, दि. 11 - अरुणाचल प्रदेशातील पापुम परे जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनात 14 लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पापुम परे जिल्ह्यातील गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत असून यामुळे येथील लापताप गावात दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास भूस्खलनाची घटना घडली.
यामध्ये आत्तापर्यंत 14 लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर, अनेक जण भूस्खलनात अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. तसेच, लापताप गावातील तीन घरांवर मोठी दरड कोसळल्याची माहिती, अतिरिक्त उपायुक्त जलश पेर्टिन यांनी दिली.
दरम्यान, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी ट्विटरवरुन या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, पापुम परे जिल्ह्यातील लापताप गावातील भूस्खलनामुळे झालेल्या जिवीत जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख झाले. या घटनेत आणखी काही जण गाडले गेल्याची शक्यता आहे. घटनास्थळी एनडीआरएफ, राज्य पोलीस आणि मेडिकल टीम पोहचली असून बचावकार्य सुरु आहे. 

(बांगलादेशमध्ये झालेल्या भूस्खलनात 100 लोकांचा मृत्यू)

(उत्तराखंडच्या भूस्खलनात अडकलेले नाशिकचे भाविक सुखरूप)

(बद्रिनाथ येथे भूस्खलनात नगरचे भाविक अडकले)