शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

केवळ तक्रारींसाठी आपले १५ अब्ज तास वाया; AI एजंट, चॅटबॉट्स होताहेत ग्राहक सेवेचा भाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 14:39 IST

पारदर्शकतेचा अभाव, ग्राहकांमध्ये असंतोष

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) चा वापर सर्वत्र वाढत आहे. पूर्वी ज्या कामांसाठी तासन तास लागयचे, ती कामे आता एआयच्या मदतीने काही मिनिटांत किंवा सेकंदात पूर्ण करता येतात. मात्र, सर्व्हिस नाऊ कस्टमर एक्सपिरीयन्स रिपोर्टनुसार, भारतीय ग्राहकांनी गेल्या वर्षी ग्राहक सेवा तक्रार दाखल करण्यासाठी १५ अब्ज तासांहून अधिक वेळ वाट पाहण्यात घालवली.

एआय एजंट व चॅटबॉट्स ग्राहक सेवेचा झपाट्याने भाग बनत आहेत. असे असूनही, ग्राहकसेवेसाठी वाट पाहण्याच्या वेळेत लक्षणीय घट झाली नाही. ग्राहकांच्या अपेक्षा आणि सेवा वास्तवाचे विश्लेषण करण्यासाठी सर्व्हिस नाऊने ५,००० भारतीय ग्राहक आणि २०४ भारतीय ग्राहक सेवा एजंट यांचे एक सर्वेक्षण केले. अहवालानुसार, ८०% भारतीय ग्राहक तक्रारींसाठी एआय चॅटबॉट्सवर अवलंबून असतात. परिस्थितीत काहीशी सुधारणा झाली आहे, परंतु अपेक्षा व सेवा पुरवठ्यामध्ये अजूनही मोठी तफावत आहे.

पारदर्शकतेचा अभाव, ग्राहकांमध्ये असंतोष

अहवालानुसार, कंपन्यांच्या वेगवेगळ्या प्रणाली व ग्राहक सेवेतील पारदर्शकतेचा अभाव यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष वाढत आहे. ८९% भारतीय ग्राहकांनी सांगितले की ते खराब सेवेमुळे ब्रँड बदलण्यास तयार आहेत. ८४% ग्राहकांनी खराब सेवेमुळे ऑनलाइन किंवा सोशल मीडियावर नकारात्मक रिव्हू दिले.

३९% कॉल राहतात होल्डवर

अहवालानुसार, ३९% ग्राहकांचे कॉल होल्डवर ठेवले जातात, ३६% लोकांचे कॉल वारंवार ट्रान्सफर केले जातात आणि ३४% लोकांचा अस विश्वास आहे की कंपन्या जाणूनबुजून तक्रार प्रक्रिया गुंतागुंतीची करतात. सर्व्हिसनाऊ इंडियाने म्हटले आहे की, कंपन्यांना ग्राहक सेवांमध्ये सुधारणा करावी लागेल. अन्यथा, त्यांना ग्राहक गमावण्याचा धोका असू शकतो.

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स