शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

एव्हरेस्टवर 15 भारतीय अडकले, सुषमा स्वराज यांच्याकडे ट्विटरद्वारे केली मदतीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2018 11:19 IST

एव्हरेस्ट शिखरावर 15 भारतीय अडकले असल्याचे वृत्त समोर आले आहे. एव्हरेस्ट शिखरावर अडकलेल्या या 15 जणांनी ट्विट करून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदतची मागणी केली आहे.

काठमांडू - एव्हरेस्ट शिखरावर 15 भारतीय अडकले असल्याचे वृत्त समोर आले आहे. एव्हरेस्ट शिखरावर अडकलेल्या या 15 जणांनी ट्विट करून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदतची मागणी केली आहे. स्वराज यांनीही या घटनेची दखल घेतली असून, त्यांनी तातडीने नेपाळमधील भारतीय दूतावासातील अधिकारी मनजीव सिंह पुरी यांना या प्रकरणात गांभीर्यानं लक्ष देण्यास सांगितले आहे. गेल्या 3 दिवसांपासून हे भारतीय एव्हरेस्टवर अडकले आहेत. खराब हवामानामुळे येथील सर्व विमान उड्डाणे रद्द झाली आहेत. त्यामुळे या लोकांना बाहेर येण्याचा मार्ग उरला नसल्याची माहिती समोर आली आहे.  

अमित थढानी नावाच्या एका गिर्यारोहकानं शनिवारी (26 मे) सुषमा स्वराज आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या ट्विटर हँडलला टॅग करून मदतची मागणी केली. 'आम्ही लुकलामध्ये अडकलो आहोत. आम्ही एकूण 15 भारतीय आहोत. स्थानिक दूतावासाशी संपर्क साधला. मात्र, अद्याप कोणतीही मदत मिळू शकलेली नाही. आमची मदत करू शकता का?,' असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. ट्विटची गांभीर्यानं दखल घेत सुषमा स्वराज यांनी नेपाळमधील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना या प्रकरणाकडे लक्ष देण्याची सूचना केली. दरम्यान, सर्व भारतीयांना सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती भारतीय दूतावासाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आली. 

 

 

टॅग्स :Everestएव्हरेस्टSushma Swarajसुषमा स्वराज