शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata Death: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

आंध्र प्रदेशात बस अपघातात १५ ठार

By admin | Published: January 07, 2015 11:57 PM

आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातून बुधवारी डोंगराळ भागातून जाणारी एक बस खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात १५ प्रवासी ठार तर ३० जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

हैदराबाद : आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातून बुधवारी डोंगराळ भागातून जाणारी एक बस खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात १५ प्रवासी ठार तर ३० जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांत नऊ महाविद्यालयीन तरुण, एक तरुणी व अन्य प्रवासी आहेत. पेनुकोंडाचे पोलीस उपाधीक्षक एन. सुब्बाराव यांनी जखमींना बेंगळुरू,अनंतपूर, पेनुकोंडा येथील रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले. हा अपघात बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास मदकसीरा व पेनुकोंडा दरम्यानच्या घाटात झाला. या ठिकाणी रस्त्याचे सपाटीकरण करण्याचे काम सुरू होते त्यासाठी रस्त्याला लागून एक लांब मार्ग खणण्यात आला होता. आंध्र प्रदेशचे गृहमंत्री एन. चिन्ना राजप्पा यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. (वृत्तसंस्था) राज्य सरकारने मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची सानुग्रह रक्कम देण्याची घोषणा केली आहे. आंध्रचे मुख्यमंत्री ए. चंद्राबाबू नायडू यांनीही या अपघाताविषयी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. आंध्र प्रदेश राज्य परिवहन मंडळाच्या या बसमधून ५० जण प्रवास करीत होते. बसचालकाने एका आॅटोरिक्षाला ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याने हा अपघात घडल्याचे अनंतपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक एस.व्ही. राजशेखर बाबू यांनी सांगितले. पंतप्रधानांना दु:खनवी दिल्ली-आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्णात झालेल्या रस्ते अपघाताची माहिती कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात ठार झालेल्या व्यक्तींकरिता दु:ख व त्यांच्या कुटुंबीयांविषयी सहानुभूती व्यक्त केली. या अपघातात ठार झालेल्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.