शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

15 कोटी भारतीय मानसिक समस्यांनी त्रस्त

By admin | Published: October 25, 2016 6:05 PM

भारतातील तब्बल 15 कोटी प्रौढ नागरिक मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत 
बंगळुरू, दि. 25 - भारतीयांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले असून, देशातील तब्बल 15 कोटी प्रौढ नागरिक  मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 
बंगळुरू येथील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेंटल हेल्थ आणि न्युरो सायन्स (निम्हान्स) ने राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण 2016 हा सर्वे केला होता. या सर्वेअंतर्गत तामिळनाडू, केरळ, गुजरात, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल मणिपूर आणि आसाममधील 40 हजार प्रौढ आणि 1 हजार 200 किशोरवयीनांचे मानसिक आरोग्य तपासण्यात आले होते. या सर्वेमधून छत्तीसगड, पश्चिम बंगाल, मणिपूर आणि आसाम या राज्यांमधील नागरिकांमध्ये सर्वाधिक मानसिक समस्या आढळून  आली आहे. तर कर्नाटकमध्ये एकूण लोकसंख्येच्य 8 टक्के नागरिक हे मानसिक आजारांनी त्रस्त असल्याचे समोर आले आहे. तसेच 13 ते 17 वयोगटातील सुमारे 7.3 टक्के मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे अधोरेखित झाले आहे. 
(मानसिक आरोग्याकडे पाहताना) 
या सर्वेमधून  दर दहापैकी एका व्यक्तीला नैराश्य, चिंता यांसारख्या मानसिक समस्या भेडसावत असून त्यातील नैराश्याने ग्रस्त असलेल्या लोकांचे प्रमाण अधिक असल्याची माहितीही समोर आली आहे. "शहरी भागांमध्ये मानसिक ताणतणावाच्या समस्येचे प्रमाण अधिक आहे. तसेच कनिष्ठ उत्पन्न गट आणि अल्पशिक्षित लोक मानसिक तणावाची शिकार होण्याचे प्रमाण अधिक असल्याचेही आढळून आले आहे," असे हा सर्वे करणाऱ्या निम्हासचे निर्देशक डॉ. बी. एन. गंगाधर यांनी सांगितले.