शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

१५ लाख रुग्ण सर्दी, तापाने बेजार खाजगी वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज : २०१२ नंतर सर्वात मोठा डेंग्यूचा कहर

By admin | Published: September 20, 2016 10:52 PM

जळगाव : जिल्हाभरात ५० लाख लोकसंख्या आहे. पैकी तब्बल १५ लाख नागरिक हे सर्दी, ताप यामुळे बेजार झाले आहेत. यात डेंग्यूसदृश व डेंग्यूच्या रुग्णांचादेखील समावेश आहे. २०१२ नंतर डेंग्यूचा सर्वात मोठा कहर झाला असून, शहरी व ग्रामीण भागात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या एकसारखीच असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.

जळगाव : जिल्हाभरात ५० लाख लोकसंख्या आहे. पैकी तब्बल १५ लाख नागरिक हे सर्दी, ताप यामुळे बेजार झाले आहेत. यात डेंग्यूसदृश व डेंग्यूच्या रुग्णांचादेखील समावेश आहे. २०१२ नंतर डेंग्यूचा सर्वात मोठा कहर झाला असून, शहरी व ग्रामीण भागात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या एकसारखीच असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.
यंदा पावसाचे प्रमाण बर्‍यापैकी आहे. पावसाचे पाणी सतत तुंबून राहिल्याने त्यात डेंग्यू डासांच्या अळ्यांची निर्मिती झाली. अळ्या नष्ट करण्यासाठी वेळीच उपाययोजना न झाल्याने डेंग्यूचा फैलास वेगाने झाला.
सोबत सर्दी, ताप, खोकला, निमोनिया यामुळे रुग्ण बेजार झाले आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच बेजार आहेत.
यात डेंग्यूच्या रुग्णांसह इतर रुग्णांनाही डेंग्यूसंबंधीची तपासणी व इतर खर्चाचा फटका बसत आहे. डेंगूच्या तपासणीसाठी किंवा चाचण्यांसाठी एक हजार रुपये खर्च येतो. शासन फक्त दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना तपासणीसंबंधी मदत करते, पण इतर रुग्णांना मदत मिळत नाही. तपासण्यांचा खर्च परवडणारा नसल्याने आजार अधिकचा त्रासदायक बनत आहे.
कुंड्या, पाण्याच्या मोठ्या टाक्या यातही डासांची उत्पत्ती होत आहे. तसेच पावसाचे पाणी महिनाभर तुंबून राहिलेल्या ठिकाणीदेखील डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत आहे. शहरांमध्ये खुले भूखंड डेेंग्यूच्या फैलावास अधिक कारणीभूत ठरत आहेत.

१० जुलैपासून साथ
जिल्‘ात १० जुलैपासून डेंग्यूची साथ पसरली. ती आटोक्यात आलीच नाही. जि.प. व जिल्हा रुग्णालयाची यंत्रणा गाफील राहिल्याने ही स्थिती निर्माण झाली. सप्टेंबर महिन्यात ही साथ अधिक भीषण बनली आहे.

जि.प.च्या आरोग्य विभागातर्फे रोज ५०० घरांचे सर्वेक्षण
जि.प.च्या आरोग्य विभागातर्फे प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून रोज ५०० घरांचे सर्वेक्षण केले जात आहे. मंगळवारी १०० पेक्षा अधिक भांडी, टाक्यांमध्ये डेंग्यूच्या अळ्या नष्ट करण्यात आल्याची माहिती मिळाली. परंतु मंगळवारी डेंग्यूसंबंधीची तिव्रता कमी झाल्याचा दावा जिल्हा आरोग्याधिकारी बी.आर.पाटील यांनी केला.