शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आसाममध्ये मंदिरातील पुजाऱ्यांना 15,000 सहायता निधी, महाराष्ट्रातही होतेय मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 18:53 IST

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी कोरोनाबाधित राज्यातील हिंदू पुजारी आणि छोट्या मंदिरांना 15 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे समितीचे राज्य समन्वयक शंभू गवारे यांनी म्हटलंय.

ठळक मुद्देराज्यातील देवस्थान ट्रस्ट फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विजय पोरे आणि सचिव हणमंतराव क्षीरसागर यांनीही राज्यातील मंदिरे खुली करण्याची मागणी केली आहे

 कोरोना महामारीमुळे देशातील प्रार्थनास्थळे गेल्या 1.5 वर्षांपासून बंदच आहेत. मंदिरे बंद असल्याने तेथील पुजारी व पुरोहितांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यामुळे, पुजाऱ्यांनाही सरकारने सहायता निधी द्यावा, अशी मागणी करण्यात येत होती. आसाम सरकारने राज्यातील मंदिरांच्या पुजाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील मंदिरांतील पुजाऱ्यांना 15,000 रुपये देण्याचा निर्णय आसाम सरकारने जाहीर केला. हिंदू जनजागृती समितीने या निर्णयाचं स्वागत केलं आहे. 

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी कोरोनाबाधित राज्यातील हिंदू पुजारी आणि छोट्या मंदिरांना 15 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे समितीचे राज्य समन्वयक शंभू गवारे यांनी म्हटलंय. महाराष्ट्रातही गेल्या 1.5 वर्षांपासून मंदिरे बंद आहेत. त्यामुळे, हिंदू जनजागृती समितीने महाराष्ट्रातील पुजाऱ्यांनाही 15 हजार रुपये सहायता निधी देण्याची मागणी केली आहे. मंदिरे बंद असल्याने तेथील लहान-सहान उद्योग ठप्प झाले आहेत. तर, मंदिरातील पुजाऱ्यांचेही आर्थिक गणित कोलमडलंय. त्यामुळे, मंदिरे खुली करण्याची मागणीही सातत्याने होत आहे. 

दरम्यान, राज्यातील देवस्थान ट्रस्ट फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विजय पोरे आणि सचिव हणमंतराव क्षीरसागर यांनीही राज्यातील मंदिरे खुली करण्याची मागणी केली आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांची सातारा येथील निवासस्थानी भेट घेवून देवस्थान मंदिरे उघडण्याची व समस्त पुजारी (गुरव) समाजाला मानधन मिळावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. 

मनसेचीही मंदिरं खुली करण्याची मागणी

केवळ मंदिरे उघडल्याने कोरोनाचा प्रसार होतो असे कोणत्या सर्वेक्षणात आले आहे का? मंदिरे हा केवळ भावनेचा नव्हे तर अनेक शहरांच्या अर्थकारणाचा विषय आहे. त्वरित सर्व मंदिरे उघडण्याचा निर्णय सरकारने घ्यावा. तसेच, जशी नियमावली सगळ्यांना लागू होते तशीच इथेही लागू करावी, अशी मागणी नांदगावकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे, राज्यातील प्रार्थनास्थळे कधी उघडणार, तेथील अर्थकारण कधी सुरू होणार, मुख्यमंत्री कधी भूमिका घेणार हेच पाहावे लागणार आहे.   

देवेंद्र फडणवीसांनीही केली होती मागणी

देवेंद्र फडणवीस हे सांगोल्यात दिवंगत नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्याघरी सांत्वनपर भेटीसाठी गेले होते. त्यावेळी, पंढरपूर येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना, त्यांनी मंदिरे खुली करण्याची मागणी केली. आम्ही हिंदू आहोत, आमचे 36 कोटी देव आहेत, दगडातही आमचा देव आहे. 'मॉल, बारमध्ये जितकी गर्दी होते, त्यापेक्षा कमी गर्दी ही मंदिरात होते. दारूची दुकानंही सुरू आहेत. खरे तर सामाजिक अंतराचे निकष पाळून मंदिरं सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने तातडीने घेतला पाहिजे. अनेक गरिबांची उपजिविका त्यावर आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :TempleमंदिरHinduहिंदूChief Ministerमुख्यमंत्री